तुझं माझं

तू आग मी पाणी
चित्र तू मी वाणी ।
काळ्या पाटीवर
उमटते लेखणी ।
अवतरते तू कशी
शब्दांची कहाणी ।
शोभते जशी मलाच
माझी म्हणून रागिणी ।
सुंदर या माळेतला
मौल्यवान तू मणी ।
तुझं माझं जमेना
बघ क्षणो क्षणी ।
Sanjay R.

आकाशाला हात

करू कशी सुरुवात
टेकेना आकाशाला हात ।
आभाळ टाकायचे सारून
पावसाने केला घात ।
निसर्गाने दिले जीवन
जन्मोजन्मीची ही साथ ।
पाण्याविना कठीण सारे
देईल पाऊसच मात ।
Sanjay R.

रात्र

रात्र असते अंधाराची
सत्ता सम्पते दिवसाची ।
सूर्य होतो नजरेआड
अवतरते छवी चंद्राची ।
चांदण्यांचे चाले नृत्य
चढते नशा अंधाराची ।
हळू हळू सरतो होश
चाहूल लागते सूर्याची ।
पहाट होता रात्र सरते
सत्ता सुरू दिवसाची ।
Sanjay R.

चाहत

जीनेको क्या चाहीये
एक सांस है काफी ।
तन मन धन और क्या
रह गया सब बाकी ।

चाहतको कोन रोक पाया
बच्चाभी चाहता एक टॉफी ।
कभी न भरता ये दिल
बस दुनिया है एक झाकी ।
Sanjay R.

विठ्ठल विठ्ठल

ओढ मनात दर्शनाची
धरली वाट पंढरीची ।

डोई पावसाच्या धारा
सुखावणारा होता वारा ।

लोट माणसांचे तेथे ।
पांडुरंग उभा जेथे ।

भरून इंद्रायणीचा काठ
झाली पुंडलिकाची गाठ ।

भाव भक्तीचाच सारा
जगी विठ्ठल एक तारा ।

हात चरणाशी लागता
कानी तुकोबाची गाथा ।

वसता डोळयात मूर्ती
आली आनंदाला भरती

मखातून पडले बोल
जय हरी विठ्ठल विठ्ठल ।
Sanjay R.

सपना

तुझे पाने का
था सपना मेरा ।
रात अंधेरी है
कब होगा सवेरा ।
रातभर तडपा
अंधेरेसे घेरा ।
तोडकर लौटा
चांद का पहेरा ।
अब भी है सूरज
छिपाये चेहरा ।
बादल है बांधे
बारीश का सेहरा ।
Sanjay R.

उंच झोका

जितका उंच झोका
त्यात तितकाच धोका ।
उंचावर जाताच वाटे
अरे कुणीतरी रोका ।
पोटात उठतो गोळा
हृदयाचा चुकतो ठोका ।
मग वाटतो नकोच
इतका उंच झोका ।
Sanjay R.

कुठे पैशाचा अंबार

कुठे पैशाचा अंबार
कुठे फक्त अंधार ।

कोणी इथे निराधार
शोधतात आधार ।
बघा त्यांचे आचार
जीवन ज्यांचे लाचार ।
कुठले हे असे विचार
गेलेत कुठे सुविचार ।
सांगा किती हा भार
करेल का कोणी प्रहार ।
Sanjay R.

बांधते दुःखाशी गाठ

झेलून मी दुःख
बघतो सुखाची वाट ।
सुख दुरून जाते
बांधते दुःखाशी गाठ ।

बघतो जेव्हा जेव्हा
सुखाचा तिथे मी थाट ।
जणू सागराचा किनारा
जाते घेऊन सारेच लाट ।

सरी श्रावणाच्या येता
झुळझुळ वाहे पाट ।
शोधू कुठे मी आता
सुंदर तोच तो काठ ।
Sanjay R.

बदला

घेतो कशाचा तू बदला
नाही मार्ग कुठे मधला ।
नशिबाचे भोग सारे
कोण यातून सुटला ।
हास्य जरी असेल गाली
पापण्यात थेंब दडलेला ।
न कळे अंतराची व्यथा
दिसतो कुणास रडलेला ।
Sanjay R.

काळोख

दुःख जन्माचे भोगतो
जीवन पिंजऱ्यात जगतो ।

नाही मोकळे आकाश
दिसतो काळा प्रकाश ।

वाटते भय आकृत्यांचे
वसले काय डोळ्यात ।

अंतरात होते धडधड
हुंदका दाटला काळजात ।
Sanjay R.

गोड तुझे अभंग

भक्तीत तुझ्या रे मी
आहे असा दंग ।
गेलो मिळून अवघा
झालो एक रंग ।
वाटे ठाई तुझ्याच
राहावे संग संग ।
गावे सदा तुझेची
गोड तुझे अभंग ।
स्मरण तुझेची होता
मीही व्हावे पांडुरंग ।
विठ्ठल विठ्ठल जपावे
नामात व्हावे दंग ।
Sanjay R.

नाही मनाला ठाव

नाही मनाला ठाव
घेईल कुठे ते धाव ।
बघताच वाटे हवे
असते सदाच हाव ।
विचारेल कोण कोणा
काय रे तुझे नाव ।
ठेवील आपला ठसा
मग खाईल किती भाव ।
सांगा जरा कोण तो
आहे आपलाच राव ।
जातो उधळून सारे
सोसतो गहिरा तो घाव ।
नका सांगू काही आता
मोडला त्याचा डाव ।
फिरवा धरून त्याला
कुठवर त्याची धाव ।
सर्यास सांगतो आता
चोर मी झालो साव ।
Sanjay R.

अंतराचे धडधडणे

गाऊ कसे कळेना
माझे जीवन गाणे ।
वाटेवर क्षणो क्षणी
विचारांचे देणे घेणे ।

कधी ओलवतात कडा
कधी डोळ्यांचे वाहणे ।
गालात फुलते हास्य
आगळे जीवनाचे तराणे ।

आठवणीत काय किती
आतच हृदयाचे रडणे ।
आशेने बघतो जेव्हा
ऐकतो अंतराचे धडधडणे ।
Sanjay R.

नवा सूर

आठवते मज ती वेळ
लोकडाऊन चा काळ ।

सगळेच बंद होते घरात
कुणीच नसायचे दारात ।

कळेना कोण कसा कुठे
वाटे जीवनाचे संकट मोठे ।

टळले आता संकट सारे
भीतीचे सावट झाले दूर
चला एकदा लावू सारे
सोबतीला एक नवा सूर ।
Sanjay R.

लपला सूर्य कुठे

लपला सूर्य कुठे
वर आभाळ दिसते ।
सर सर येतो पाऊस
ऊन मात्र नसते ।

जिकडे तिकडे पाणी
भर भरून वाहते ।
जगणे झाले कठीण
नदीच झाले रस्ते ।
Sanjay R.

माझी मलाच सजा

विसरेल मी कसा
मनात तू माझ्या ।
आठवणीत विसरतो
मलाच मी तुझ्या ।
मनात भाव तोच
होईल कसा दुजा ।
नाहीस तू ही तर
माझी मलाच सजा ।
Sanjay R.

गरज

काय समजायचे ते समज
प्रत्येकाला असते गरज ।
आज जशी मला गरज
पडेल उद्या तुलाही समज ।
Sanjay R.

हवी तुझी साद

वाद हा कशाचा
हवा थोडा संवाद ।
मूक मी कसा राहू
मनही करतं नाद ।
नको काही मज
फक्त हवी थोडी दाद ।
गैरसमज आहे सारा
हवी तुझी मज साद ।
Sanjay R.