” गळ्यात फासाची दोरी “

खायचे अन्न असेल तर
मर्यादा आहेत त्याला ।
मर्यादा नाही मुळीच
पैसे खायचे ज्याला ।

चोरी चकारी लबाडी
करतात जे हरामखोरी ।
बांधून फिरवा त्यांना
गळ्यात फासाची दोरी ।

कडेलोट करा त्यांचा
आहेत जे अनाचारी ।
गौरव होईल त्यांचा
आहेत जे परोपकारी ।
Sanjay R.

” चटका गरिबीचा “

जन्मताच जी मिळते आपणा
असते ती श्रीमंती वा गरिबी ।

चटका तिचा जीवनात भारी
गरीब फिरतो दारोदारी ।

पोटा साठी माणूस भिकारी
चाले वण वण दिशा चारी ।

श्रीमंत असतो पैशाचा आजारी
गरीबाच्या तर तीच मजबुरी ।

ठरवतो पैसा हलका भारी
पैश्यासाठी चाले जीवनाची वारी ।
Sanjay R.

” पावसाची रात्र “

” पावसाची रात्र “

ही गोष्ट फार पूर्वीची आहे. आम्हा विदर्भ वासीयांना मुंबईचे एक विशेष आकर्षण असते. मलाही मुंबईचे खूप आकर्षण होते. मला पण वाटायचं श्रीमंत व्हायचं असेल तर श्रीमंती देणारं एकच शहर आहे आणि ते म्हणजे मुंबई. आपणही मुंबई ला जावं आणि खूप श्रीमंत व्हावं. कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या दृष्टीने प्रयत्न केलेत आणि नोकरीनिमित्ताने माझ्या एक मित्र सोबत पोचलो मुंबई ला .
मुंबईला राहण्याची व्यवस्था आमच्याच एका मित्राच्या सोबत नवी मुंबई येथे झाल्या मुळे ती एक मोठी चिंता मिटली होती.
चिंता फक्त नोकरीची राहिली होती. तेव्हा आम्ही मुंबई ला पोचताच तिथले लोकल पेपर्स घेऊन नोकरी च्या जाहिराती वाचन सुरू केले.
आणि योग्य जाहिराती शोधून, तिथे सम्पर्क करण्यास सुरुवात केली, साधारणतः 8 दिवसातच आम्हा दोघा मित्रांना नोकरी मिळाली पण माझी नोकरी वसई येथे अति दूर असलेल्या भागात मिळाली. वसई मी कधीच बघितले नव्हते, म्हणून अगदी पहाटेच उठून तयार होऊन नोकरी जॉईन करायला मी देवाला नमसकार करून घराच्या बाहेर पडलो , तेव्हा नवी मुंबई वरून बसने ठाण्याला यावे लागायचे आणि नंतर तिथून लोकल ने पाहिजे तिथे जाता यायचे मी . ठाण्याला येऊन लोकलने दादर आणि मग दादर हुन वसई ला पोचलो. यातच मला दुपार झाली. नोकरी ज्या कंपनीत लागली ती कम्पनी शोधत शोधत मी पोचलो आणि नोकरी जॉईन केली. ऑफिसची वेळ 10 ते 6 राहणार होती. माझ्या मनात नोकरी मिळाल्याची खुशी होती परंतु कम्पनीत मला लागलेला वेळ आणि कष्ट बघून चिंता पण वाटत होती. त्या विचारातच 5 वाजले. पहिला दिवस असल्याने मी परवानगी घेऊन 5 लाच तिथून परत निघलो आणि स्टेशन ला पोचलो. स्टेशनवरची गर्दी बघून तर मला फारच भीती वाटली. दादरकडे जाणारी प्रत्येक ट्रेन अगदी गच्च भरून येत होती आणि उतरणाऱ्यांपेक्षा जास्त चढणाऱ्यांना घेऊन ट्रेन निघत होती. गर्दी मूळे मात्र माझी गाडीत चढण्याची हिम्मतच होत नव्हती. मी तसाच दोन तास दादरला जाणाऱ्या ट्रेन चे निरीक्षण करत फ्लॅटफॉर्म वरच बसून राहिलो. शेवटी 7 वाजता हिम्मत करून ट्रेन मध्ये घुसलो, कारण आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. आकाशाकडे तर मुळीच लक्ष नव्हते. आता फक्त मित्र आणि घर च दिसत होते. दादर येयीस्टव, ट्रेन मधली गर्दीही कमी झाली होती. मी थोडा आरामातच दादर ला उतरलो आणि ठाण्याला जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसलो.
ट्रेन मध्ये बसल्या बसल्या पावसाला सुरुवात झाली . पाऊस खूपच जोरात कोसळत होता. तशातही ट्रेन पुढे निघाली पण कुरल्याला येऊन ती थांबली आणि  जवळपास एक दीड तास तिथेच थांबून राहिली . ट्रॅक मध्ये पाणी असल्याने पुढे ट्रेन जाणार नाही असा निष्कर्ष लोक काढत होते. त्यातच ट्रेन परत सुरू झाली आणि धक्के खात खात घाटकोपर येथे पोचली. मात्र घटकोपरला अनौन्समेंट झाली की आता ट्रेन पुढे जाणार नाही. माझ्या तर काळजात धस्सच झाले, पोटातले कावळे पण खूपच त्रास देत होते.
फ्लॅटफॉर्म वर उभे राहायला पण जागा नव्हती जिकडे तिकडे लोक आणि पाणी याशिवाय काहीच दिसत नव्हते. मी विचार केला चला ट्रेन जाणार नाही तर बस  बघू या, बसने पोचता येईल म्हणून स्टेशन च्या बाहेरच्या बाजूला आलो तर रस्त्यावर कमरे इतके पाणी होते, आणि मध्ये मध्ये ड्रेनेज चे झाकण उघडल्याचे जाणवत होते, रस्ता पार करणे ही कठीणच होते . मग मी परत तसाच फ्लॅटफॉर्म वर परत गेलो आणि पाणी कमी होण्याची वाट बघत राहिलो. रात्री तीन वजताचे दरम्यान थोडे रस्त्यावरील पाणी कमी झाले, मग लोकांच्या मागे मागे मी पण पायीच ठाण्याला निघालो. दोनेक तास पाई चालल्यावर ठाणे  बस डेपो ला पोचलो. तिथून बस पकडून मी घरी पोचलो तर सकाळ झाली होती.
मित्र उठून चहा पित बसला होता.
मला बघताच तो विचारतो अरे रात्री कुठे होतास, किती पाऊस झाला, कुठे होता, आता येतो आहेस, तुझी तर नोकरी वर जायची वेळ झाली आहे.
मी त्याला झालेला प्रसंग सांगितला आणि माझ्या डोक्यावरचे पूर्ण प्रेशर रिलीज केले, चहा नास्ता करून जो झोपलो तो दोन दिवस मस्त घरीच लोळून काढले. नंतर पेपर मध्ये पावसाचा कहर आणि त्या मुळे झालेले नुकसान वाचून कळले की मुंबईचा पाऊस साधा नसतो, तो अनुभवायचा असतो. जो मी अनुभवला होता.

आणि हो त्या नंतर मी वसई ला परत कधी गेलोच नाही. माझ्या त्या नोकरीचा तो पहिला आणि शेवटचा तोच दिवस होता.
अशी हाती माझी मुंबईतली पहिली नोकरी ….

Sanjay R.

” अंत झाला माणुसकीचा “

उरलीच कुठे माणसात
संस्कृती आणि सभ्यता ।
दूर गेली अडगळीत आता
दिसते कुठे प्रमाणिकता ।
विचारांचा झाला अंत
आहे बदलली मानसिकता ।
जिथे तिथे वर्चस्व स्वार्थाचे
त्यात माणसाची अगतिकता ।
पैसाच झाला महत्वाचा आणी
अंत झाला माणुसकीचा ।
Sanjay R.

” मनात जिद्द “

असेल मनात जर जिद्द
होईल पार सम्पूर्ण हद्द
हेतू हवा सम्पूर्णतः शुद्ध
होतील सुखी आबाळ वृद्ध
जीवन जगणे हेची युद्ध
जायचे पुढे मनात हीच जिद्द
Sanjay R.

” नेहमीच हसत राहा “

जीवनाचा नाही भरोसा
आज आहे उद्या नाही
उद्या कसा माहीत नाही
रोजचे स्वच्छंद जीवन
झाले घरात बंदिस्त
वाटले नव्हते कुणास
घरातच होईल सूर्यास्त
प्रत्येक सूर्योदयाला
थोडे तुम्ही हसा
इतरांना ही हसवा आणि
नेहमीच हसत राहा
Sanjay R.

” जीवन ऑनलाइन “

काय काय होणार ऑनलाइन
जग पुढे पुढे पळतय
नका राहू मागे व्हा तुम्हीही जॉईन
पैसा आणि बँका आहेत ऑनलाइन
खरेदी विक्री, देणे घेणे होते ऑनलाइन
जीवन बदलतंय होतंय ऑनलाइन
झाला माणूस किती बिझी
विसरला मैत्री नाते ओळख पाळख
विसरला परोपकार झाला स्वार्थी
उरलाच कुठे हो पर्याय सांगा
होतील आता लग्नही ऑनलाइन
मोबाईल वरूनच व्हायचे जॉईन
जुळले फळले तर मुखावर शाईन
उरतील थोडे त्यातही कॉइन
लागली आहे मोटठी लाईन
सारेच होईल आता फक्त ऑनलाइन ।
Sanjay R.

” मनातले सत्य “

भारी जातोय आता
रोज एक एक दिवस
डोकं झालं जड आणि
मन झालंय नर्व्हस ।

महिना लोटला आता
किती बसायचं घरात ।
कशी ही भीती जीवनाची
मृत्यू वाट बघतोय दारात ।

सरला पैसा सरले धान्य
प्रश्न उरला आता पोटाचा ।
कष्टासाठी आहेत हात
फक्त मार्ग हवा वाट्याचा ।

युद्ध आहे वा हे आक्रमण
पसरले विषारी संक्रमण ।
जीवनाचे आहेत मार्ग बंद
तरीही लढायचे आमरण ।

जातील हेही दिवस एकदा
सुखाच्या खुलतील वाटा ।
मनात मात्र असेल कायम
हृदयात रुतलेला तोच काटा ।
Sanjay R.

” पुस्तक “

पुस्तक ज्ञानाचे भांडार
विचारांचा तो सागर
शब्द पुस्तका विना निराधार
अभ्यासकांचा तो आधार
आयुष्याचा उचलते भार
जीवनात देई बहार
मानू कसे मी आभार
पुस्तका विना जीवन अंधार
Sanjay R.

” घरीच राहा जाऊ नका बाहेर “

सगळेच आहेत घरात
बघायचे उभे राहून दारात ।
महिना होत आला
भीती जीवाची मनात ।

बसून घरात हो आता आता
बघायचा मोबाईल टीव्ही ।
आदेश सगळे पाळायचे
देईल जे जे हो तुमची देवी ।

खाऊन खाऊन वाढेल वजन
संभाळाल जरा थोडे पोट ।
कंट्रोल कराल खाण्यावर
समजू नका पोटाला मोट ।

जाईल कोरोना लवकरच
नियम तुम्ही जर पाळाल ।
चढू जीवनाची शिडी परत
जर मोह आज टाळाल ।
Sanjay R.

” का झालास तू वैरागी “

सोडून तू रे घरदार
का झालास वैरागी ।
सांग ना कुणासाठी
झालास तू असा त्यागी ।

काखेत झोळी तुझ्या
अंगावर वस्त्र एक भगवे ।
विचार आमचे कुत्सित
केले तुलाच रे नागवे ।

लोभ मोह माया मत्सर
सोडून तू असा निघाला ।
भावना क्रूर किती आमची
सम्पविले तुझ्या जीवाला ।

रक्षक झालेत रे भक्षक
विश्वास करू मी कुणाचा ।
थांग लागणे कठीण रे
धगधगलेल्या या मनाचा ।

पेटली आहे आग आता
उरेल फक्त राख त्याची ।
माणूस मारेल माणसाला
लागली तहान रे रक्ताची ।

माणुसकीचा झाला अंत
कोण महात्मा कोण संत ।
रक्त पिपासू झालो आम्ही
नाही कसलीच आम्हा खंत

कोण निरपराध सांग इथे
अपराधी ही उन्मत्त झाला ।
भाव आता त्याच्या चरणी
तोच भोगी महान झाला ।
Sanjay R.

” सोडून जाताना “

विनाशक मीच विध्वंसक
सम्पवले रे मीच तुला ।
कोण तू कोण मी
विसरलो रे मीच मला ।

बघतो मी जेव्हा तुला
मीच माझा उरत नाही ।
सम्पवतो मी मारून तुला
मीच का रे मरत नाही ।

होतो भ्रमित बघून तुला
विचारांचाच हा असा भ्रम ।
सम्पेल हे विश्व सारे
पडणार नाहीत कुणास श्रम ।
Sanjay R.

” उरली कुठे माणुसकी “

नाहीच उरली कुठे
माणसात हो माणुसकी
स्वार्थी झालेत सारे
नाही कुणात आपुलकी

मन झालं किती कठोर
निष्ठुरता भरली अंतरात ।
रडणे विसरला माणूस
नाही आसव डोळ्यात ।

पैसा पैसा हवा पैसा
नाही उरला भरवसा ।
माणूसच उरला कुठे
वागतो सैतान जैसा ।

Sanjay R.

” पाप आणि पुण्य “

फळ कर्माचे इथे
पाप आणि पुण्य ।
मरणानंतर होते
सारेच एक शून्य ।

विचारांचा सार हा
पाप कुणास मान्य ।
करील जो पुण्य
जीवन त्याचे धन्य ।

सुख आणि समाधान
हेच पुंण्याचे निष्पन्न ।
दुःख आणि दारिद्र्य
रूप पापाचे सामान्य ।
Sanjay R.

” काळ हा कसा “

सर्वच गोष्टींनी परिपूर्ण
असा काळ कुठला असेल ।
काही कमी काही जास्त
कमी अधिक तर असेल ।

कुठे स्वातंत्र्य कुठे पारतंत्र्य
कुठे ज्ञान कुठे विज्ञान असेल ।
कुठे विज्ञान कुठे तंत्रज्ञान
तर कुठे अज्ञानही असेल ।

गरिबी श्रीमंती चे विभाजन
लक्षाधीश सत्ताधीशही असेल ।
राजे महाराजे कुणी सम्राट तर
मंत्री संत्री ,घातक विघातक असेल ।

अनाचारी अत्याचारी गुन्हेगारी
तेव्हाही तर तसे बरेच  असेल ।
देव, प्रभू, संत आणि महात्मे
राम कृष्ण गांधी नेहरु ही असेल ।
Sanjay R.

” एक झुरका सोड तू मूर्खां “

कसा रे तू मूर्खां
पोचलास मरणाला
तरीही का तुला
हवा एक झुरका

सिगरेट आणि बिडी
स्वतःच असेल जळत ।
सोबत तुही जळतोस
का नाही तुला कळत ।

भयंकरच रे हा कॅन्सर
घेऊन जीवच जातो ।
सोड आता ही नशा
मुदत थोडी तुला देतो ।

व्यसन तम्बाकुचे
दे तू सोडून आता ।
छोटी छोटी बाळ तुझे
हो त्यांचा तू पिता ।
Sanjay R.

” स्वप्न लग्नाचे “

शालू आई बाबांची आवडती लेक, शिंद्यांची एकुलती एक मुलगी. हुशार आणि कर्तबगार . मेहनतीने आणि कर्तृत्वाने ती इंजिनिअर झाली आणि नोकरी मिळवून स्वतःचे अस्तित्व तिने निर्माण केले .

शालूने आई बाबांची तिच्या शिक्षणाची आणि नोकरीची काळजी मिटवली होती. आता बाबांना तिच्या लग्नाची काळजी लागली होती. तशातच मानेंच्या अतुलची तिला मागणी आली . अतुलही तिच्याच ऑफिसला तिचा सहकर्मी होता. सुस्वभावी आणि जिद्द असलेला अतुल शालूला योग्यच वर होता .

अतुलचे आई बाबा आणि बहीण शालू कडे येऊन त्यांनी शाळूची मागणी घातली. स्थळ चांगले असल्यामुळे शिंद्यांच्या घरी खुशीचे वातावरण झाले होते. आणि पंडितांनी 20 एप्रिल ही तारीख काढली. लग्नाला आता 2 महिने बाकी असल्यामुळे सगळंच अगदी शांततेत होईल असा सगळ्यांनाच विश्वास होता . त्या दृष्टीने हॉल , स्टेज, लायटिंग, डेकोरेशन, सगळ्याच बुकिंग झालं होतं. कॅटरर ही ठरला होता

. मेनू पक्का झाला होता . पूर्ण चार दिवसांचं बुकिंग झालं होतं, लग्नाच्या पत्रिका छापून सगळ्या नातेवाईक आणि मित्र मंडळींना निमंत्रण पाठविण्यात आले होते. सगळे आनंदात सुरू होते .

त्यातच टीव्ही वर चीन मध्ये सुरू असलेल्या कोरोना संबंधातील बातम्या देशाची चिंता वाढवत होत्या.  पण शिंदे आणि माने परिवाराला प्रकरण किती गंभीर होईल याचा मुळीच अंदाज घेता आला नाही .

लग्न समारंभासाठी सगळ्यांचेच पैसे देऊन झाले होते आणि सगळे  20 एप्रिलचिच  वाट बघत होते.

तशातच पंतप्रधानांनी 20 मार्च ला एक दिवसाचा जनता करफू जाहीर केला आणि , सगळ्यांनाच एका भीतीच्या लाटेत लोटले. परत 21 दिवसांचा लॉक आउट डिक्लेअर झाला तो 14 ला संपणार  होता, तोच एक आता आशेचा किरण होता . पण देशात कोरोनाच्या बधितांची संख्या वाढतच होती. त्यामुळे लॉक डाऊन परत वाढेल याचा सगळ्यांनाच अंदाज आला होता. आणि झालेही तसेच . लॉक डाऊन 3 मे पर्यंत परत वाढवण्यात आला, आणि लग्न

समारंभावर पाणी फिरले. झालेला सम्पूर्ण खर्चच वाया गेला होता, सगळ्यांना फोन करून काही पैसे परत मिळण्याची थोडी आशा निर्माण झाली परंतु शालू आणि अतुल या दोघांनी पाहिलेले त्यांचे आयुष्याचे स्वप्न . ते तर अर्धेच राहिले होते. आता दोघेही परिस्थिती सामान्य होण्याची वाट बघत आहेत. त्याशिवाय पर्यायच नाही . Sanjay R.

” वात्सल्य “

” वात्सल्य “

वात्सल्य ही तर
जीवनाची धुरा ।
आई असें त्यात
वात्सल्याचा झरा ।

आई विना सांगा
कोण इथे खरा ।
जीवन मृत्यू तर
आयुष्याचा फेरा ।

आई विना पोर
विचारच नको जरा ।
प्रेम वात्सल्या विना
वाटे अर्थहीन ही धरा ।
Sanjay R.

” भीती “

भीती
दिवसच असे आलेत. सरकारी आदेशानुसार सारेच घरात कोंडून घेऊन बसले होते, बाहेर निघण्याची मनाई होती.
घरात असलेलं सगळंच सामान संपायला आलं होतं.
घरात होते नव्हते पैसेही सम्पले होते. हाताला काम नसल्यामुळे पैसे येण्याची शक्यता सम्पलेलीच होती . आता पुढचे कसे होणार याची चिंता लागली होती. 
तारा त्याच विचारात असताना , बाजूच्या वंदूने तिला हाक दिली ती पण तिला ऐकायलाच आली नाही.
वंदूने परत तिला आवाज दिला,तेव्हा ती भानावर आली.
काय झालं ग वंदे , कुठे निघालीस, बाहेर जायला बंदी आहे ना, रस्त्या रस्त्यात पोलीस अडवतात म्हणते ना, तू कुठे निघालीस.
आग काय करणार, घरातलं  सगळंच सम्पलं ग , काय करावं कळेच ना, आज स्वयपाक पण नाही केला ग. चौकात कोणी पुढारी धान्य वाटप करत आहे म्हणते , चालते का जाऊन पाहू,पोरं उपाशीच आहेत ग. वंदू बोलली.
वंदूकडे पण तीच परिस्थिती होती. तसे ताराला थोडा धीर आला. चल जाऊ या म्हणत दोघीही चौका कडे निघाल्या. चौकात धान्य वाटप सुरू होते पण रांग बरीच मोठी होती, पण पोटाच्या भुके पुढे त्याचे दोघींनाही काहीच वाटले नाही. उलट आनंदच झाला कारण दोनचार दिवस पुरेल इतकं धान्य वाटप तिथे चालू होतं.
दोघीही रांगेत लागल्या आणि मंद गतीने पुढे सरकू लागल्या. जवळपास एक तासाने त्यांचा नंबर लागला आणि आपल्या वाट्याच धान्य घेऊन त्या आनंदाने घराकडे परत निघाल्या.

डोळ्यापुढे रात्री जेवणाला काय करायचं या विचारात दोघीही चालत होत्या . तेवढ्यात त्या भागातील गुंड मंगु दादा त्यांच्या पुढे उघडा चाकू घेऊन उभा ठाकला . दोघींच्याही काळजात धस्स झाले. आता हा काय करणार या भीतीने दोघीही थरथर कापायला लागल्या. मंगुदादा त्यांच्या हातातील धान्य हिसकावून घेणार हा विचारच दोघींनाही असह्य होत होता. त्यांनी आपल्या हातातील धान्य लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण मंगु दादा च्या ते लक्षात आले आणि त्याने सरळ दोघींच्या हातातील धान्य हिष्कावण्याचा प्रयत्न केला. रस्ता सुनसान होता. जवळपास कुणीच दिसत नव्हते. तेव्हा आरडा ओरड करूनही काहीच उपयोग होणार नव्हता. दोघींनाही त्यांच्या हातातील पिशव्या मंगु च्या स्वाधीन करायचा निर्धार केला. मात्र परत रात्री मुलांना उपवास घडणार या विचाराने त्यांच्या डोळ्यातुन पाणी वाहायला लागले.

आणि त्यांनी देवाचा धावा सुरू केला.  आणि खरच आज देवही त्यांच्या मदतीला धावला. नेमकी त्याच वेळी जोराने सायरन वाजवत पोलिसांची गाडी तिथे येऊन धडकली. गाडीचा सायरन ऐकून मंगु ही तिथून सगळं सामान टाकुन पळून गेला.

तसा दोघींच्या मनात धीर आला. पोलिसांची गाडी थांबली. आणि पोलीस बाहेर आले. दोघींनी पोलिसांना सगळी हकीकत सांगीतली तसे पोलीस मंगु दादा ज्या दिशेला पळाला होता तिकडे निघून गेले . आणि तारा वंदू आपल्या घरी पोचल्या.

आता पुढच्या तीन चार दिवसांची चिंता मिटली होती. त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
Sanjay R.

” लॉक डाऊन “


दूर झालेत सारे
वळणावर कुठल्या मी आलो ।

देणे घेणे आपलेच आता
स्वयंसिद्ध कसा मी झालो ।

नव्हता वेळ कशाला
भेटलो असतो शेवटी मरणाला ।

ठेविले कोरोना तू घरात
कळले महत्व घराचे या जीवनाला ।

नाते गोते सारे कळले
स्थैर्य लाभले विचाराला ।
Sanjay R.