लोभी मन

लोभी तू लबाड
खऊनी झाला जाड ।
वाढला रे असा कसा
वाटतो जसा ताड ।

समोर होतो जेव्हा उभा
भासतो मज तू पहाड ।
आवाज किती छोटा
थोडासा तू रे दहाड ।

अप्पू वाटतो तू गेंडा
थरथरते कसे रे झाड ।
वाटते भीती ही मजला
सांग करू कसे मी लाड ।
Sanjay R.

लोभी मन

नकोच मनात लोभ
विचारांचा होतो अंत ।
वाढतो किती हव्यास
उरते कुठे मग खंत ।

मनाचा हा विकार कसा
लोभापायी चुकते वाट ।
आपुलकिशी सरते नाते
जीवनाची तुटते गाठ ।
Sanjay R.

मन

मन मनाला कळेना
अंतरात मन जळेना ।
झेलते मन आघात
वार मनावरचे टळेना ।
Sanjay R.

मन हे असे कसे

काय सांगू तुला
मन हे असे कसे ।
बघून बघ तुला
अस्थिर होते कसे ।
मनात आहे काय
कळेना कुणा कसे ।
शब्दही मनातले
मनातच वसे ।
Sanjay R.

वेडे कसे म्हणू मनास

स्वप्न बघतो मी जेव्हा
होतो तुझाच आभास ।
येताच समोर चेहरा
क्षणभर थांबतात श्वास ।
आठवण जाईना दूर
लागतो एकच ध्यास ।
नजर शोधते नजरेला
वेडे म्हणू कसे मी मनास ।
Sanjay R.

नाही तिथे प्रकाश

वाट ती अज्ञानाची
नाही तिथे प्रकाश ।
गर्द काळा काळोख
माणुसकीचा विनाश ।
ज्ञान हेच विज्ञान
तोडी जुने सारे पाश ।
उजळून निघेल मग
भासेल सुंदर आकाश ।
Sanjay R.

लोकलचा प्रवास

तुझी माझी मैत्री
अनोखी ही किती ।
नसेल नात्यात जशी
तशी आहे ना प्रीती ।

नाही कशाचा स्वार्थ
नाही कुठली निती ।
तरीही जुळली कशी
काळजी पण किती ।

बंध असू दे असाच
फुलवू आपण नाती ।
अखंड असेल प्रीत
तेवेल अशीच ज्योती ।
Sanjay R.

मुंबई लोकल

मुंबईत आमच्या, गर्दी तुफान
तीच तर आहे, लोकलची शान ।

घड्याळीचा काटा, चाले जसा
लोकलनेही घेतला, तोच वसा ।

सारखी धावते, फुरसतच नाही
असू दे ना गर्दी, पण वाटते शाही ।

भेद भाव नाही, गरीब वा श्रीमंत
सगळ्यांना घेते, नाहीच हो अंत ।

संसाराला मदत, जगण्याचा आधार
उचलते तीच, सगळ्यांचाच भार ।

कल्पनाच नको, तिच्या नसण्याची
सारेच थांबेल, प्राणवाहिनी मुंबईची ।
Sanjay R.

तुझी माझी मैत्री

तुझी माझी मैत्री
अनोखी ही किती ।
नसेल नात्यात जशी
तशी आहे ना प्रीती ।

नाही कशाचा स्वार्थ
नाही कुठली निती ।
तरीही जुळली कशी
काळजी पण किती ।

बंध असू दे असाच
फुलवू आपण नाती ।
अखंड असेल प्रीत
तेवेल अशीच ज्योती ।
Sanjay R.

भरले डोळे त्यात पाणी

जीवन माझे ऐक कहाणी
भरले डोळे त्यात पाणी  ।
शब्दात होते अर्थ मनाचे
शब्द थांबले वदली वाणी ।

नाही उरले त्राण तनात
उरले सुरले हात हे दोन्ही ।
वाट कुणाची पाहू आता
सारे सरले नाही कोणी ।

वर आकाश खाली धरती
कोण कुठला इथला दाणी ।
नको वाटते जगणे आता
गाऊ कसा मी जीवन गाणी ।
Sanjay R.

तूच तू

कोण कुठे नी कशास तू
कळेना मज पण मनात तू ।
शून्यात कधी बघतो जेव्हा
हरवतो मी आणि स्वप्नात तू ।

शोधते नजर का कुणास
नजरेत असतेस तेव्हाही तू ।
मिळते नजरेस नजर जेव्हा
भासते मला की हसतेस तू ।

ओढ म्हणू की प्रेम मी
सदा असते अंतरात तू ।
सहज लागते उचकी जेव्हा
तेव्हाही असते आठवणीत तू ।
Sanjay R.

हवा पैसा

करू कुणावर विश्वास
नाही कुणाचा भरोसा ।
स्वर्थीच आहेत इथे
सगळ्यांना हवा पैसा ।

माया ममता प्रेम सरले
पैसा पैसा आहे कैसा ।
झाला माणूस क्रूर किती
जणू माजलेला भैसा ।
Sanjay R.

ठेव थोडा विश्वास

ठेव थोडा विश्वास
असू दे थोडा ध्यास ।
मिरवू नकोस असा
मिटतील सारे आभास ।
येईल असाच कोणी
घेऊन जाईल घास ।
जगेन घे हवे तसे
शेवटी थांबतील श्वास ।
Sanjay R.

अघटीत घडले

बसेना विश्वास कुणाचा
अघटीत सारे घडले ।
विचारा विचारात मग
महत्वाचे काम अडले ।
सांगेना कोणीच काही
कोडे मलाही पडले ।
दिवस रात्र बघत असतो
व्यसन मोबाईलचे जडले ।
Sanjay R.

लग्नानंतरचे प्रेम

नसेल होत व्यक्त
म्हणून
प्रेम कुठे होते कमी ।

प्रपंचाच्या या व्यापात
मात्र
प्रेमाची असतेच हमी ।

लग्नापूर्वी वेळ जाईना
पण
नंतर मात्र वेळ कमी ।
Sanjay R.

शिव शंभू

शिव शंभू तू
सांब सदाशिव ।
थरथर कापे
सारे दानव ।

ठायी तुझ्या रे
अमुचा भाव ।
तुझ्याविना रे
नाही ठाव ।

पिंडी वरती
ठेऊन माता ।
चरणी तुझ्याच
आमुची धाव ।

तू भोळा
तूच निळा ।
महादेव तू
आम्हा पाव ।
Sanjay R.

देवाचा तू देव शंकर

हे जटाधारी महादेव
तिंहीलोकीच्या नाथा
सर्प नंदी आणि त्रिशूळ
त्यात आहे तुझी गाथा ।

करिसी त्रिलोकी तू भ्रमण
श्रीगणेशाचा तू पिता ।
वास्तव्य तुझे कैलासावरी
वसते तिथेच पार्वती माता ।

देवांचा तू देव शंकरा
नमन करितो मी आता ।
निळकंठ तू भस्मधारी
ठेवितो पिंडीवरती माथा ।
Sanjay R.

मिठी

जशी कृष्णा ने
सुदामाला दिली
प्रेमाची एक मिठी ।
मैत्री किती ती दृढ
जगायचे मरायचे
फक्त मैत्री साठी ।
Sanjay R.