लोभी तू लबाड
खऊनी झाला जाड ।
वाढला रे असा कसा
वाटतो जसा ताड ।
समोर होतो जेव्हा उभा
भासतो मज तू पहाड ।
आवाज किती छोटा
थोडासा तू रे दहाड ।
अप्पू वाटतो तू गेंडा
थरथरते कसे रे झाड ।
वाटते भीती ही मजला
सांग करू कसे मी लाड ।
Sanjay R.

लोभी तू लबाड
खऊनी झाला जाड ।
वाढला रे असा कसा
वाटतो जसा ताड ।
समोर होतो जेव्हा उभा
भासतो मज तू पहाड ।
आवाज किती छोटा
थोडासा तू रे दहाड ।
अप्पू वाटतो तू गेंडा
थरथरते कसे रे झाड ।
वाटते भीती ही मजला
सांग करू कसे मी लाड ।
Sanjay R.
नकोच मनात लोभ
विचारांचा होतो अंत ।
वाढतो किती हव्यास
उरते कुठे मग खंत ।
मनाचा हा विकार कसा
लोभापायी चुकते वाट ।
आपुलकिशी सरते नाते
जीवनाची तुटते गाठ ।
Sanjay R.
मन मनाला कळेना
अंतरात मन जळेना ।
झेलते मन आघात
वार मनावरचे टळेना ।
Sanjay R.
काय सांगू तुला
मन हे असे कसे ।
बघून बघ तुला
अस्थिर होते कसे ।
मनात आहे काय
कळेना कुणा कसे ।
शब्दही मनातले
मनातच वसे ।
Sanjay R.
स्वप्न बघतो मी जेव्हा
होतो तुझाच आभास ।
येताच समोर चेहरा
क्षणभर थांबतात श्वास ।
आठवण जाईना दूर
लागतो एकच ध्यास ।
नजर शोधते नजरेला
वेडे म्हणू कसे मी मनास ।
Sanjay R.
वाट ती अज्ञानाची
नाही तिथे प्रकाश ।
गर्द काळा काळोख
माणुसकीचा विनाश ।
ज्ञान हेच विज्ञान
तोडी जुने सारे पाश ।
उजळून निघेल मग
भासेल सुंदर आकाश ।
Sanjay R.
गळ्यात फुटके लॉकेट
म्हणे उडवायचे रॉकेट ।
दिवस रात्र करायचे वेट
लाचार सारे होत नाही भेट ।
Sanjay R.
तुझी माझी मैत्री
अनोखी ही किती ।
नसेल नात्यात जशी
तशी आहे ना प्रीती ।
नाही कशाचा स्वार्थ
नाही कुठली निती ।
तरीही जुळली कशी
काळजी पण किती ।
बंध असू दे असाच
फुलवू आपण नाती ।
अखंड असेल प्रीत
तेवेल अशीच ज्योती ।
Sanjay R.
मुंबईत आमच्या, गर्दी तुफान
तीच तर आहे, लोकलची शान ।
घड्याळीचा काटा, चाले जसा
लोकलनेही घेतला, तोच वसा ।
सारखी धावते, फुरसतच नाही
असू दे ना गर्दी, पण वाटते शाही ।
भेद भाव नाही, गरीब वा श्रीमंत
सगळ्यांना घेते, नाहीच हो अंत ।
संसाराला मदत, जगण्याचा आधार
उचलते तीच, सगळ्यांचाच भार ।
कल्पनाच नको, तिच्या नसण्याची
सारेच थांबेल, प्राणवाहिनी मुंबईची ।
Sanjay R.
तुझी माझी मैत्री
अनोखी ही किती ।
नसेल नात्यात जशी
तशी आहे ना प्रीती ।
नाही कशाचा स्वार्थ
नाही कुठली निती ।
तरीही जुळली कशी
काळजी पण किती ।
बंध असू दे असाच
फुलवू आपण नाती ।
अखंड असेल प्रीत
तेवेल अशीच ज्योती ।
Sanjay R.
जीवन माझे ऐक कहाणी
भरले डोळे त्यात पाणी ।
शब्दात होते अर्थ मनाचे
शब्द थांबले वदली वाणी ।
नाही उरले त्राण तनात
उरले सुरले हात हे दोन्ही ।
वाट कुणाची पाहू आता
सारे सरले नाही कोणी ।
वर आकाश खाली धरती
कोण कुठला इथला दाणी ।
नको वाटते जगणे आता
गाऊ कसा मी जीवन गाणी ।
Sanjay R.
कोण कुठे नी कशास तू
कळेना मज पण मनात तू ।
शून्यात कधी बघतो जेव्हा
हरवतो मी आणि स्वप्नात तू ।
शोधते नजर का कुणास
नजरेत असतेस तेव्हाही तू ।
मिळते नजरेस नजर जेव्हा
भासते मला की हसतेस तू ।
ओढ म्हणू की प्रेम मी
सदा असते अंतरात तू ।
सहज लागते उचकी जेव्हा
तेव्हाही असते आठवणीत तू ।
Sanjay R.
गळ्यात लॉकेट
वाटे जणू पॉकेट ।
लतकन असे गळ्यात
चालला जसा डकैत ।
Sanjay R.
करू कुणावर विश्वास
नाही कुणाचा भरोसा ।
स्वर्थीच आहेत इथे
सगळ्यांना हवा पैसा ।
माया ममता प्रेम सरले
पैसा पैसा आहे कैसा ।
झाला माणूस क्रूर किती
जणू माजलेला भैसा ।
Sanjay R.
ठेव थोडा विश्वास
असू दे थोडा ध्यास ।
मिरवू नकोस असा
मिटतील सारे आभास ।
येईल असाच कोणी
घेऊन जाईल घास ।
जगेन घे हवे तसे
शेवटी थांबतील श्वास ।
Sanjay R.
बसेना विश्वास कुणाचा
अघटीत सारे घडले ।
विचारा विचारात मग
महत्वाचे काम अडले ।
सांगेना कोणीच काही
कोडे मलाही पडले ।
दिवस रात्र बघत असतो
व्यसन मोबाईलचे जडले ।
Sanjay R.
नसेल होत व्यक्त
म्हणून
प्रेम कुठे होते कमी ।
प्रपंचाच्या या व्यापात
मात्र
प्रेमाची असतेच हमी ।
लग्नापूर्वी वेळ जाईना
पण
नंतर मात्र वेळ कमी ।
Sanjay R.
शिव शंभू तू
सांब सदाशिव ।
थरथर कापे
सारे दानव ।
ठायी तुझ्या रे
अमुचा भाव ।
तुझ्याविना रे
नाही ठाव ।
पिंडी वरती
ठेऊन माता ।
चरणी तुझ्याच
आमुची धाव ।
तू भोळा
तूच निळा ।
महादेव तू
आम्हा पाव ।
Sanjay R.
हे जटाधारी महादेव
तिंहीलोकीच्या नाथा
सर्प नंदी आणि त्रिशूळ
त्यात आहे तुझी गाथा ।
करिसी त्रिलोकी तू भ्रमण
श्रीगणेशाचा तू पिता ।
वास्तव्य तुझे कैलासावरी
वसते तिथेच पार्वती माता ।
देवांचा तू देव शंकरा
नमन करितो मी आता ।
निळकंठ तू भस्मधारी
ठेवितो पिंडीवरती माथा ।
Sanjay R.
जशी कृष्णा ने
सुदामाला दिली
प्रेमाची एक मिठी ।
मैत्री किती ती दृढ
जगायचे मरायचे
फक्त मैत्री साठी ।
Sanjay R.