चेतवू नको ही वाणी
दुःखाची आहे कहाणी ।
पडेल अपुरे विझविण्या
टाकशील कितीही पाणी ।
बघ डोळ्यात जरा दिसेल
आटलेल्या अश्रूंची निशाणी ।
मुखावर आहे खोटेच हास्य
अंतरात आहेत गाऱ्हाणी ।
Sanjay R.

चेतवू नको ही वाणी
दुःखाची आहे कहाणी ।
पडेल अपुरे विझविण्या
टाकशील कितीही पाणी ।
बघ डोळ्यात जरा दिसेल
आटलेल्या अश्रूंची निशाणी ।
मुखावर आहे खोटेच हास्य
अंतरात आहेत गाऱ्हाणी ।
Sanjay R.
थाम्ब जरा तू नको जाऊ
करू किती मी विनवणी ।
बघ वळून जरा काय मागे
दिसेल जुनीच ती निशाणी ।
हृदयात ठेवली जपून मी
तुझी माझी ती गोड कहाणी ।
घट्ट हृदयात अजूनही रुतलेली
सांग काढू कशी निशाणी ।
येतो आठवणींचा पूर जेव्हा
थांबेचना डोळ्यातले पाणी ।
नको करुस मनावर आघात
सांगून तू गेलीस की चेतावणी ।
Sanjay R.
प्रेमाला कुठल्या सीमा
आयुष्यभर ते जपावे
प्रेमपुढे सारेच तुच्छ
छान आनंदात जगावे ।
Sanjay R.
श्रीमंतीची हौस कुणा
पैश्यातूनच पैसे उणा ।
हवा असेल पैसा अधिक
वजा नको करा गुणा ।
भाग तुमच्या नावे होईल
कष्ट हवेत पुन्हा पुन्हा ।
चोरीनेही मिळेल सारे
ठरेल तो तर मोठा गुन्हा ।
कपट्यांची ही नाही कमी
हातोहात लावतात चुना ।
पडते पितळ उघडे जेव्हा
दोष देशील सांग कुणा ।
इमानदारीत आनंद किती
नको श्रीमंती गरीब बना ।
Sanjay R.
पडू दे आता पाऊस
भिजू दे ही धरा ।
पाहताहेत वाट सारे
सुटू दे गार वारा ।
Sanjay R.
कधी पडतो पाऊस खूप
कधी दिसेचना त्याचे रूप ।
येतात कधी वादळ वारे
हाती निसर्गाच्या हे सारे ।
नसते कमी मेहनत माझी
पण नाही कुणा कदर त्याची ।
फळ मेहनतीचेही का मिळेना
गुन्हा काय माझा काहीच कळेना ।
Sanjay R.
भरू दे ना बाजार
खिशात नाही पैसा ।
पैश्याविना होते काय
दाबतो मनात हौसा ।
गरिबाचे जगणे कठीण
स्वप्न बघतो दिवसा ।
अर्धपोटी झोपी जातो
वाटतो वेडा पिसा ।
Sanjay R.
गर्दी किती माणसांची
भरला इथे बाजार ।
वेगळे सारेच इथे
जणू जडला आजार ।
निस्वार्थ शोधू कुठे
आहे सारखाच शेजार ।
डाव साधतो कुणी
कुणी आहे लाचार ।
मजली लूट कशी
नाही कशाचा विचार ।
जो तो करी माझे माझे
फक्त स्वतःचाच प्रचार ।
नाही उरली माणुसकी
शोधतो मी आधार ।
मिळेल का कुठे माणूस
की सगळीकडे अंधार ।
Sanjay R.
वाट संसाराची कठीण
खडतर किती हा प्रवास ।
पोटाशिवाय असतो का
दुसरा कुठला ध्यास ।
भरले जरी पोट गच्च
सरत नाहीच हव्यास ।
अनाचारी होतो मग
घेतो हिसकून घास ।
स्वतःचाच विचार असतो
इतरांना देतो त्रास ।
राक्षस होतो कधी तोच
लालची पणाचे सारे प्रयास ।
अंत्य समयी काय नेतो
सोडून इथेच जातो श्वास ।
माणुसकीला असता जगला
नसता झाला कसला त्रास ।
चार सुखाचे दिवस सुटले
कुठे मिळाला त्याला विश्वास ।
Sanjay R.
पुढे पुढे सरकत काटे
चाले घड्याळ अविरत ।
वेळ कशी ही कुठे थांबते
जगतो मी दिवस सारत ।
काल नव्हता आज सारखा
येणार कुठे तो परत ।
उद्या ची मी वाट पाहतो
नको आज, उद्या करत ।
Sanjay R.
पडेल आता पाऊस
वाट नको तू पाहुस ।
नागर वखर हाक जरा
मागे तू नको राहुस ।
पाऊस पडेल यंदा
घाबरून नको जाऊस ।
भरभरून होईल पीक
पुर्ण तुझी होईल हौस ।
पैसा येईल खूप हाती
बजेट आता नको लाऊस ।
खर्च करूनही उरेल काही
टेन्शन असे नको घेऊस ।
महागाई तर ही जन्माची
सावकार कसा नको पाहुस ।
कर्जाचा बोजाच वाईट
फ़ंद्या कडे नको धाऊस ।
वळून थोडे बघशील जरा
रडगाणे तू नको गाऊस ।
बायको मुलांना हसव जरा
सोडून सारे नको जाऊस ।
तुझ्यासारखी हिम्मत कुणात
काळजी घराला नको लाऊस ।
नशिबाचा खेळ जरी हा
यंदा नक्कीच येईल पाऊस ।
Sanjay R.
नको येउस तू
मी दूरच बरा ।
बघून का हसते
सांग ना जरा ।
लावले वेड मज
काय तुझी तऱ्हा ।
नजरेला दे नजर
सुखवेल ही धरा ।
Sanjay R.
मनात आहे ती वेडी आशा
करू किती मी तुझी प्रतीक्षा ।
कुठे शोधू मी सांग तुला
नाही उरल्या कुठल्या दिशा ।
थकले आता हे डोळे माझे
का कळेना तुज माझी दशा ।
येणारच नाहीस तू परत
कशास देतेस मजला शिक्षा ।
Sanjay R.
विसरेल कसा सांग
आठवतो मला अजूनही
तुझ्या माझ्या भेटीचा
तो पहिला दिवस ।
दूर तू होतीस उभी
वाट कुणाची बघत
नजरा नजर झाली आणी
बघितले वळून मी परत ।
नशिबात होते काय
कुणास ठाऊक
परत परत झाली भेट
इच्छा मनाची नव्हती सरत ।
हळूच केव्हा ते
कसे बोललो आपण
शब्द जुळले मन मिळाले
सरला अंतरातला मी पण ।
अजूनही तसाच मी
आहे त्याच वाटेवर
आठवणी सुटणार नाही
प्रेमच असावे तुझ्यावर ।
Sanjay R.
टाकले आकाश झाकून
निघाली ढगांची वारी ।
येऊ दे सोसाट्याचा वारा
बरसू दे शब्दांच्या सरी ।
रिमझिम त्या पावसात
भिजेल कथेतली परी ।
हळूच अवतरेल कविता
घेऊनिया आनंद शिरी ।
ओसंडून वाहील पाणी
निसर्ग फुलेल नदी तीरी ।
हिरवे होईल सारे रान
बघतील नजरा भिरी भिरी ।
Sanjay R.
जीवन झाले दुर्धर
प्रेम हवे नको द्वेष ।
राहतो जिथे आम्ही
जसा देश तसाच वेश ।
नकोत विचार मनाचे
कळ्या दगडावरची रेष ।
लागतील भोगावे मग
आयुष्यभर ते क्लेश ।
प्रेम द्या आणि प्रेम घ्या
करू नका हो द्वेष ।
Sanjay R.
दिवस कालचा
होता खास ।
झालो आनंदी
घेऊनही त्रास ।
अंतरात सदा
होता ध्यास ।
मार्गी लागले
सारे प्रयास ।
घट्ट झाला
मनात विश्वास ।
जगण्यासाठी
हवेच श्वास ।
क्षणात सारे
सरले भास ।
तुजविण नाही
कोणी खास ।
Sanjay R.
या जीवनात माझ्या
प्रत्येक दिवास खास ।
उजाडण्याची बघतो वाट
असे जगण्याचा ध्यास ।
एक कोर भाकरीसाठी
सोसतो सारेच त्रास ।
अहोरात्र चाले असाच
जीवनाचा हा प्रवास ।
हसतो कधी रडतो कधी
हाच अर्थ जीवनाचा खास ।
Sanjay R.
शब्दांचा हा खेळ कसा
जोडून होतात चार ओळी ।
वेध घेऊन जाते मनाचा
वाटे कधी ती किती भोळी ।
कधी करी ती वार मनावर
आघात तयाचे किती छळी ।
चार ओळींची जरी कविता
भाव वसतो तिच्या तळीं ।
Sanjay R.
निघेल कसा वेळ
अजून आयुष्य बाकी ।
तुझ्याशिवाय जगणे म्हणजे
विराण जीवनाची झाकी ।
Sanjay R.