आज दिनांक 30.12.2018 ला माझी कविता ” माझ्या मनातली कविता ” तरुण भारत नागपूर, आसमंत पुरवणीत प्रकाशित झाली .
संपादकांचे खूप खूप आभार .
Monthly Archives: December 2018
” विचार “
असेच काही तरी
विचार येतात मनात ।
शब्द रूपानं अवतरतात
काव्य होऊन पानात ।
Sanjay R.
” जिंदगी क्या हैं तू “
देखी जब तस्वीर उनकी ।
न जाने दिलको क्या हुवा ।
खो गये तस्वीरमे और लगा
जिंदगी है आग और हम धुवा ।
हर कदम हर वक्त बस
जलते रहे हम ।
ना आखो मे असू
ना दिल मे गम ।
फिरभी लागता
जिंदगीमे कुछ तो है कम ।
रास्ता लंबा कितना
चालते राहना है अब ।
सुख दुःख तो साथी है
पर कोई न होगा तब ।
Sanjay R.
” इयर एन्ड “
सरले हे वर्ष आता
मनात बरेच उरले ।
झाले किती पूर्ण आता
निश्चय जे जे धरले ।
जिकण्याचे स्वप्न होते
परी तेचि हरले ।
वर्षाचे दिवस किती
मोजून पूर्ण भरले ।
अजूनही मन हे रिते
ठाव कुणास किती उरले ।
जगायचे आनंदात अजून
निश्चय मनाशीच ठरले ।
Sanjay R.
” नका विचारू वय “
प्रश्न एक भारी
ग वय काय पोरी ।
म्हणू नका काकू
उत्तर मिळेल सॉरी ।
मी नाही काकू
यंगच मी नारी ।
झाले थोडी जाड पण
वळून बघतात सारी ।
बघ जरा तिकडे
दुसरी कोणी म्हातारी ।
मी तर आहे अजूनही
इंद्राघरची परी ।
परत नको करुस
असली चौकशी सारी ।
वय कुणी सांगतं का
फालतूचिंच हुशारी ।
Sanjay R.
” चार ओळींचे दार “
” ” चार ओळी ” ”
” दार ”
न्हाई भीती न्हाई छत
सताड उघडं दार ।
आनंदी सारे झोपळीत माह्या
ह्याच जीवनाचा सार ।
Sanjay R.
” अतूट बंध ”
तुझ्या आणि माझ्यातला
एक अतूट बंध ।
जसा अंगणात फुलला मोगरा
आणि दरवळतो सुगंध ।
चल वेचू या दोघेही यातून
मैत्रीचा आनंद ।
Sanjay R.
———– ——————
” नातं ”
तुझं माझं नात
गीत मंजुळ गात ।
स्वर अंतरातले त्यात
आहेत ते सात ।
Sanjay R.
——————————
” प्यार मेरा ”
तू क्या जाने प्यार मेरा
याद करता हु चेहरा तेरा
खो जाता हु यादोमे तेरे
लागती तुम हो हर सितारा
गालोमेही सही हसदो थोडी
झूम उठेगा आसमान सारा ।
Sanjay R.
———————————–
” सरली रात ”
सरली रात
उजिडल आता
पडलं झाकटं ।
उठ ना बाबू
शिवाचं हाये
पूरच घर फाटकं ।
Sanjay R.
——————————–
” गुलाब ”
गुलाबाचा रंगच किती न्यारा
वाटते साऱ्यायलेच प्यारा ।
संग काट्यायच्या रायते तरी
देते कोमय मनाचा इशारा ।
Sanjay R.
————- ———————
” माझ्या मनातले आभाळ “
” माझ्या मनातले आभाळ ”
मन आभाळ आभाळ
येई भरून क्षणात ।
कधी होई रिते सारे
नसे विचार मनात ।
कधी नजर गगनात
दाटे अंधार अंतरात ।
होई घालमेल मनाची
थेंब पाण्याचा डोळ्यात ।
कधी वाटे घेउन भरारी
जावे दूर आकाशात ।
तोडून चंद्र आणि तारे
पेरावे अंगणात ।
बाग फुलेल चांदण्यांची
चंद्र हसेल नभात ।
निरखावे रूप त्याचे
बसावे गीत आनंदाचे गात ।
मन आभाळ आभाळ
येई भरून क्षणात ।
नाही होणार रिते सारे
ठेवले आहे एका कणात ।
Sanjay Ronghe
Nagpur
” नव वर्ष स्पेशल “
दिल चाहता है
करू मै मस्ती ।
लडखडताहेत पाय
झाली जास्ती ।
पाणी टाकूनच प्यायची
नहीतर
यायची आफत नसती ।
Sanjay R.
🥃🥃
” वृद्धावस्था “
काय आलेत दिवस
झाली कशी अवस्था ।
मुलं मुली गेलेत दूर
डोळे पाहताहेत रस्ता ।
हात पाय थकलेत आता
थरथरते अंग, वाटते भीती ।
म्हातारे झालेत डोळे
आसवही गळणार किती ।
कान अधू डोळे अधू
नाही कुणाची साथ ।
विसरू नको देवा मला
तुझाच रे मदतीला हात ।
आठवणींचा डोंगर उलटतो
होते विचारातच पहाट ।
नकोच वाटतो सूर्योदय
शोधतो अंधारातच वाट ।
Sanjay R.
” वा रे कांदा “
किती रडवी हा कांदा
कित्येकांचा झाला वांदा
कुणी घालतो गळ्यात फंदा
घासही खाली उतरत नाही
फोडणीला हवा एकच कांदा
नसेल तो तर होतो वांदा
Sanjay R.
” निमंत्रण “
92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, यवतमाळ , कविकट्टा काव्य मंचावर माझी वर्हाडी कविता “माह्या वऱ्हाडाची माती ” ही कविता सादर करण्या साठी निमंत्रण प्राप्त झाले
आयोजकांचे खूप खूप आभार
” शब्द अंतरातले “
शब्दा विन कुठली वाचा
अंतरात त्याचा ढाचा ।
जोडी मानाचे बंध
देई शब्दच आनंद ।
फुलवी मुखावरी हास्य
देई नेत्रात अश्रू ,भाष्य ।
कधी वाटे कर्णास गोड
कधी तुटे नात्याची जोड ।
शब्द शब्दातले अंतर
प्रवाह शब्दांचा निरंतर ।
मुखातून ध्वनित शब्द होती
कागदावरी ते अवतारती ।
गुणगान शब्दांचे गावे
अंतरात तेचि विसावे ।
सारेच आहे आपुल्या हाती
घात शब्दच करून जाती ।
फुलवू चला शब्दांची बाग
सापडेल आनंदाचा माग ।
Sanjay R.
” प्रश्न “
परीक्षेचे दोन भाग
प्रश्न आणि उत्तर ।
का ! एक प्रश्न
म्हणून एक उत्तर ।
प्रश्नाला परत प्रश्न
नसतेच मग उत्तर ।
आयुष्य पडे अपुरे
प्रश्न सतराशे बहात्तर ।
विचारांचा खेळ सारा
नसे कुठलेच उत्तर ।
जीवन होई प्रश्न
जगतोय हेच उत्तर ।
Sanjay R.
” मित्र “
दूरच हवा सगा सोयरा
मित्र माझा किती तू बरा ।
सुखदुःख येता जवळ जरा
उभा पाठीशी मित्रच खरा ।
Sanjay R.
” याद “
तू क्या जाने
प्यार मेरा ।
याद करता हु
चेहरा तेरा ।
खो जाता हु
यादोमे तेरे ।
लागती तुम हो
गगन का तारा ।
गालोमे ही सही
मुस्कुराओ थोडी ।
झूम उठेगा
आसमान सारा ।
Sanjay R.
” ओम शांती “
होते किती
डोक्याले ताप ।
तोंडातून निघते
शिव्या शाप ।
ह्रीदयाले लागते
मोठी धाप ।
नकाच मारू
फालतू थाप ।
दवडू नका
अंतरीची वाफ ।
भानगळच नको
करा शांतीचा जाप ।
Sanjay R.
” माझ्या मनातली कविता “
” माझ्या मनातली कविता ”
मन माझे निराकार
कधी घेइ ते आकार ।
बांधी सुमनांचे हार
फुलती पुष्प हजार ।
कधी वाटे सारा अंधार
अंतरी मग होई प्रहार ।
मनाला मनाचा होकार
कधी मनच देई नकार ।
आनंदाची होता बहार
अंतरात उडती तुषार ।
दु:खाचा होता आजार
मग ह्रुदय होई तार तार ।
लेखणी भरता हुंकार
संगे शब्दांचा आधार ।
घेई जन्म ओळी चार
त्यात जिवनाचा सार ।
असंख्य झेलुनही वार
जशी गीत गाते सतार ।
लेउन सुख दु:खाची विजार
पेलतो मी आयुष्याचा भार ।
Sanjay Ronghe
Nagpur
” राम कृष्ण हरी “
मानसाचं जीवन
लयच भारी ।
खटपट केली का
होते काय तरी ।
बसून रायल्यानं
काय भेटन घरी ।
मेहनत कराले
फिरा दारोदारी ।
देव बी भेटते
केली का वारी ।
करा खटपट
राम कृष्ण हरी ।
Sanjay R.
” पोट्टे इचित्तर “
गावचे आमच्या
पोट्टे भाय इचित्तर ।
पोऱ्यायच्या नावानं
लिहे थे पत्तर ।
थातूर मातूर कागद भरून
लावे त्याले अत्तर ।
तिकीट नसे लिफाप्याले
दंड पडे बत्तर ।
पोट्टे आमच्या गावचे भौ
लायच इचित्तर ।
Sanjay R.
” नदी “
आमच्या गावले
होती एक नदी ।
तपते लयच ना
उन्हाया मधी ।
होत न्हाई पाऊस
पावसायात कधी ।
पार आटून गेली
रायली न्हाई सुदी ।
वाटन बी नाई तुमले
होती नदी कधी ।
लय हाल उन्हायाचे
पानी दिसते डोयामदी ।
Sanjay R.