” दुखःही कसे आनंदी होते “

“दुखःही कसे आनंदी होते”

हलकेच ओढुनी चादर
निवांत निजली चांदणी ।
वेडा चंद्र निघाला
तिज शोधाया हिरकणी ।
sanjay R.

कल्पकतेतला रंग
असाच असतो ।
ह्रुदयात जाउन
कसा बसतो ।
मन विखुरते
सैरभैर होते ।
दुखःही कसे
आनंदी होते ।
जिवनही मग
रंगमय होते ।
sanjay R.

जाउ या चला
सागर सफरीला ।
तयार होडी
आहे दिमतीला ।
खारे पाणी
आहे संगतीला ।
झोक लाटांचे
आहे गमतीला ।
हळुच मासा
येयील चमकीला ।
जिव वरखाली
होई भरतीला ।
नभात चांदणी
आली हिमतीला ।
जायचे मज
आता धरतीला ।
sanjay R.

अर्पीला मी जन्म सारा
का तुटला विश्वास तुझा ।
नाही हरीश्चंद्र मी सखा
सोडुन दे आभास तुझा ।
sanjay R.

” आली बघा दिवाळी “

” आली बघा दिवाळी ”

आली बघा दिवाळी
चला जाउ खरेदिला ।
खिशात नाही पैसा
कर्ज काढुया खर्चाला ।
चंपु गंपुला नवा शर्ट
हवी साडी रमीला ।
फाटका शर्ट टाचुन घेउ
चालेल मग दिवाळीला ।
मिठाइ फटाके महाग फार
चिवडाच ठेउ फराळाला ।
पावसान यंदा सार नेल
गवत उरलय उपासाला ।
sanjay R.

हलकेच ओढुनी चादर
निवांत निजली चांदणी ।
वेडा चंद्र निघाला
तिज शोधाया हिरकणी ।
sanjay R.

अंबर करता सिंचन
त्रुप्त होई धरा
चढेल प्रीतीला
रंग खरा, वाह धरा ।
sanjay R.

” परंपरा आणी रुढीं ”

नक्कीच आपल्या पुर्वजांनी
ज्या परंपरा आणी रुढीं
बांधुन दिल्यात त्या मागे
शास्त्रीय कारणं आहेत ।
आणी आपण बघतोच
आहोत, त्या काळातही
विज्ञान आणी तंत्रज्ञान
बरेच प्रगत होते ।
जसे ईजिप्त मधील
पिऱयामीड, रामाचा
विमान लंका ते अयोद्ध्या
युद्धानंतरचा परतीचा
प्रवास, रामायणातील
युद्धात वापरले गेलेले
विवीध शस्त्र, महाभारतात
संजय द्वारा ध्रुतराष्ट्राला
दिलेला युद्ध व्रुत्तांत, जुन्या
काळातील मंदीर लेण्या
व त्यांचे अद्वितीय बांधकाम
आणी असे बरेच काही
सांगता येयील ।
आणी म्हणुन जुन्या परंपरा
आणी रुढींना नाकारणे
म्हणजे आपलाच मुर्खपणा
ठरेल ।
sanjay R.

” दिला पाहुन हिरा ”

आई बाबानी
दिला पाहुन हिरा ।
आता जन्मभर
मागे त्याच्या फिरा ।
sanjay R.

ये माझ्या कवेत
बस अशी नावेत ।
मिळु दे श्वासात श्वास ।
थेंब थेब प्राशन करुनी
विझवु तनाची प्यास ।
sanjay R.

फुलाला अस सजवु
गंध त्यातला घेउ ।
चांदणी रात्र सोबत
बहुपाशात जागउ ।
sanjay R.

कसे सांगु तुजला
मनात आहे लव्ह ।
मनात तुझ्या काय
हूदया माझ्या कळव ।
sanjay R.

मनाच काय
कळत नाय ।
आवाज येतो तिथुन
हेल्लो हाय ।
sanjay R.

वाटत घट्ट बांधाव्या
संग तुझ्या गाठी ।
अम्रुत कराव प्राशन
ओठ लाउनी तुझ्या ओठी ।
sanjay R.

मनात माझ्या
तु अशी बसली ।
सोबत तुझी असतांना
आता चिंता कसली ।
sanjay R.

काय खर काय खोट ।
मन त्याच खुप मोठ ।।
मनात माझ्या तुच राजा ।
का हीच आहे मला सजा ।।
sanjay R.

” भुकेला हवी भाजी भाकर ”

घालता फुंकर
उडती पाखर ।
भुकेला हवी
भाजी भाकर ।
sanjay R.

आनंदी बोल
जिवन अनमोल ।
दुखी मन
माती मोल ।
sanjay R.

मनात बहुत
कल्पनांचे झरे ।
आनंदी जिवन
क्षण अपुरे ।
sanjay R.

असतीस तु जाडी
किंवा सनकाडी
परवडली नसती
लाडी गोडी
आठवणीन तुझ्या
धगधगते नाडी
sanjay R.

नको घोडा
नको गाडी
मज हवी
लाडी गोडी
sanjay R.

जिवनाचा आनंद
द्यायचा मज तुला ।
दुखः नाही द्यायचे
मज तुझ्या मनाला ।
sanjay R.

साद तुने द्यावी
कानी माझ्या यावी ।
धाउन येता मी
साथ तुझी असावी ।
sanjay R.

जाणले मी मन तुझे
दे मजसी क्षण तुझे
जगु आता संगतीन
जिवन तुझे माझे
sanjay R.

आठवतात त्या
पावसाच्या धारा
चिंब ओले होउन
वेचलेल्या गारा ।
कागदी नावांचा
खेळ पसारा ।
गाणे पावसाचेनी
ढग गडगडणारा ।
लखलखाट विजेचा
आणी वादळ वारा ।
आला आला पाउस
शाळेला बुट्टी मारा ।
sanjay R.

mi aahe na
mani ghar karil
hatat hat
tuza mi dharil

sanjay R.

” I Miss You “

कोइ कहे मै सुंदर हु
जन्नत की मै नुर हु
मुझसा नही यहा कोइ
बोलो तब मै क्या कहु
I Miss You……………
sanjay R.

दुसऱयाची तारीफ करताना
माणुस स्वताःला का विसरतो
असा असतो ना म्हणुनच तो
समोरच्याचे मनात वसतो
sanjay R.

अभ्यासाचे पुस्तक
ठेउन समोर
करायची सफर सरीता ।
मनातल्या विचारांना
बांधुन शब्दात
येक करायची कवीता ।
sanjay R.

मन उदास असलेना
कि आभाळ भरुन येते
आणी विज कडाडताच
नेत्रातुन बरसु लागते

धरतीला सोइरसुतुक नसते
पाण्यात मस्त चिंब भिजते
हवेच्या झोक्यासंगे हलकेच
अंग झुलवत आनंदान हसते
sanjay R.

” जाणतो व्यथा तुझ्या मनाची “

” चारोऴया ”

जाणतो व्यथा तुझ्या मनाची
साशंक नजर त्या जनाची
आठव जरा ते जुने दिवस
मजा काही औरच
लपुन छपुन एकांतात भेटायची
sanjay R.

घालील मी फुंकर
तुझ्या वेदनेवर
ठेव जपुन आठवणी
मनी जिवनभर
sanjay R.

टाक तोडुन ती रीत
फुलवु अशी प्रीत
गाउ या प्रेम गीत
आहेस तु माझीच मीत
sanjay R.

पक्की बांधली आहे गाठ
सुटायची नाही
केला कितीही आट
मैत्री तुझी माझी
आहे इतकी दाट
चालाया तयार मी
लांब असली जरी वाट
sanjay R.

नयन असले
जरी दोन
ओढ मात्र
मनात येक ।
बंधन असे
अनेक सारे
बंध पुरे
फक्त येक ।
sanjay R.

ho thambun ahe mi
priti chya ya rati
hat ghenya tuza hati
bas ithach julatil
aaplyatli hi nati goti

धारेविना टरबुजही
कापायचे नाही ।
जोर शब्दात नसेल तर
कुणाच्या काळजात
घुसायचे नाही ।
sanjay R.

आम्ही लिहीतो फक्त
शब्दांना धार कुठे असते ।
मनात कुणाच्या
कधी कुठे ठसते ।
मन आमचेच
आमच्यावर हसते ।
sanjay R.