नजरेपुढे माझ्या एक कोरे पान । नव्हते शब्द त्यावर पण होत्या भावना । कितीतरी वेळ असाच होतो मी बघत । निघायचे तिथून मनच नव्हते करत । अगोदरच मिटवले होते त्यातले शब्द पट । बाजूलाच होते पडलेले नवे कोरे कागद । परत लिहायला नवीन मनोगत । कुणास ठाऊक भरतील की नाही । कळेना काही की जातील वाऱ्यासह उडत । आता सुचत नाही कविता त्या कथेचा ही अंत । पण मनाला वाटत वाहत राहावी ती धार अगदी शांत आणि संथ । Sanjay R.
निदान या दिवाळीत तरी कमली ला एखादी साडी घ्यावी, मुलीला फ्रॉक, मुलाला पॅन्ट शर्ट, थोडी मिठाई, थोडे फटाके घ्यावे असे वाटत होते पण पैसाच नाही तर काय आणि कसे खरेदी करणार…..
यंदा पावसाने पाठच सोडली नव्हती…..
शेतात सोयाबीन तर पूर्णच वाहून गेले होते…..
तुरीची झाडही आती पावसाने जळून वळून गेली होती…….
आता आशा फक्त कपाशीची होती…..
अर्धे नुकसान तर आधीच झाले होते……
बियाणे खत औषधाचा सारा खर्च वाया गेला होता…….
पराटी ही साथ देईल असे वाटत नव्हते. बोण्ड अळीचा काहीच भरोसा नव्हता…..
पावसामुळे झाडांची वाढही झाली नव्हती……
आलेली फुलं बोण्ड पकडायच्या आधीच पावसाने गळून पडत होते……
निसर्गाचा प्रकोप सुरूच होता……..
निंदन , औषध यातच पैसा लागत होता…..
तरी बरं होतं की कृषी केंद्र वाला उधारीत सगळं देत होता. नाहीतर जहर पिण्याशिवाय पर्यायच उरला नसता……..
पण आता उधरीचे पैसेही वाढत होते. त्यावर व्याज द्यावे लागणार होते………
तशातच आता ही दिवाळी आली. काय करावे काहीच सुचत नव्हते……..
नामा विचार करत आपल्या पराटी कडे बघत बसला होता…… तशातच संध्याकाळ व्हायला आली…..
सदा त्याला आवाज देत होता पण नामाच्या कानात त्याचा एकही शब्द जात नव्हता…….
शेवटी सदा नामाजवळ पोचला…….
नामा मात्र आपल्याच विचारात इतका मग्न झाला होता की त्याला कशाचेच भान उरले नव्हते…….
सदाने त्याला हलवून भानावर आणले…….
एकदम दचकून उठत नामा बोलला, “काऊन गा सदा काय म्हणत होता”…….
सर्वस्व लावून पणाला लहानाचे करतात मोठे । प्रेम पैसा काळजी किती वाटते इतर नातेच खोटे । माय बापाची माया कशी वाटे लेकास ठेऊ कुठे । लेक होतो जेव्हा मोठा आईबाप त्यास नको वाटे । Sanjay R.
बघू दे चंद्राचे मुख केला निर्जल उपवास । राहवत नाही आता थांबतील का असेच श्वास । जेवणात आहे पंचपक्वान्न लागला त्यांचाच ध्यास । ये ये रे चंद्रा आता तुझ्या दर्शनाची आहे आस । करवा चौथ आहे आज दिवस आहे किती खास । तुझ्या दर्शना शिवाय रे जाईल कसा पोटात घास । Sanjay R.