” चालायचा दंगा कधी पंगा “

दिवस गेला एक एक
सरलेत किती वर्ष ।
होतो मी लहान जेव्हा
मोठे व्हायचे आकर्षण ।

वाटायचं होऊ दे मोठं
जगील मी मनसोक्त ।
रागवणार नाहीत कोणी
करील वाटेल ते मस्त ।

मोठा झालो सारंच जगलो
आठवतो मी जुने दिवस ।
वाटतं हवेत परत तेच
बालपणाचे दिवस सरस ।

हसणं ते रडणं ते दूर झालं
हरवली ती मजा मस्ती ।
मिळणार नाही परत कधीच
चालायची जी कट्टी दोस्ती ।

खेळ दंगा व्हायचा पंगा
रोज असायचा नवा दिवस ।
सारंच सम्पलं, घरात आता
हरवलं बालपण, मन नर्व्हस ।
Sanjay R.

” जन्माची गाठ “

साक्षीने अग्नीच्या सखे
झालो एक घेऊन फेरे सात ।

योगाचा हा खेळ सारा
तुझ्या माझ्या जन्माची गाठ ।

झाला संसार सुखाचा
जीवनाला लाभली तुझी साथ ।

सुख आली दुःख आली
त्यात होती आनंदाची बरसात ।

सुटुच नये वाटतं मजला
सात जन्म हातातला हात ।
Sanjay R.

” क्यू याद आती है “

क्यू याद मुझे आती है
मुझको यु सताती है ।

अब जाके कह दो उनको
यादोको भी याद सताती है ।

कहू किसे मै हु परेशान
सबकुछ वह तो जानती है ।

छोड दे वह अब जिद अपनी
खुदको भी क्यू सताती है ।
Sanjay R.

” त्या दोघी “

दोघी दोघी कोण त्या
होत्या बहिणी बहिणी
सीता आणि गीता
आहे दोघींची कहाणी
दिसायच्या सारख्या
गफलत क्षणोक्षणी
सुंदरते सोबतच
सुरेख होती वाणी
गोड होता गळा
गायच्या त्या गाणी
विचारा काहीही
प्रश्न करा कोणी
उत्तर देत काव्यात
पाठ होत्या म्हणी
सीता साधी भोळी
गीता महा गुणी
सहनशील सीता
डोळ्यात तिच्या पाणी
हजरजवाबी गीता
उत्तर देई क्षणी
सारेच घाबरायचे
नव्हते शत्रू कोणी
लग्न होऊन जेव्हा
झाल्या त्या वहीनी
जुळ्या भावांच्या
बायका दोघी बहिणी
आई वडील निश्चिन्त
मुली निघाल्या गुणी ।
Sanjay R.

” शब्दांना असती पंख “

शब्दांना असतात पंख
जातात दूर ते वाऱ्यासंगे
अंतरात करतात घर
चर्चाही त्यावर खूप रंगे

आघात शब्दांचा हृदयावर
घेई दुःख तिथे आकार
सहज कधी निघती शब्द
अर्थ तयाचे ते निराकार

कधी चकमक होई शब्दांची
शब्दाने शब्द मग वाढे
राग द्वेष मोह मत्सर गुण सारे
अवतरती शब्दातून सारे तिढे

माया ममता प्रेमाचे दर्शन
जाती शब्द सारेच सांगून
भाव भक्तीचा शब्दातून येता
भक्तही जाई भावनेत रंगून ।
Sanjay R.

” नसेल कोणी मरणाला “

सांगा काय बोलणार
आयुष्यावर….
निरबन्धच आलेत ना
जगण्यावर…..

म्हणतात निघू नका
घराबाहेर…..
जायचे नाही
गावाबाहेर….

चुकून जरी गेलात तर
याद राखा…..
व्हाल तुम्ही कोरन्टीन
चवदा दिवस…..

नजरेत लोकांच्या हो
कोरोना ग्रस्त…..
डोळ्यापुढे दिसेल मरण
झालेले स्वस्त…..

एकदा नेले जर तुम्हास
दवाखान्यात…..
डेथ सर्टिफिकेट मिळेल
घरच्यांच्या हातात….

मिळणार नाही खांदे चार
शेवटाला…..
दुसराच कोणी देईल अग्नी
नसेल कोणी मरणाला….
Sanjay R.

” आत्मविश्वास “

सम्पवू नको ही लढाई
जिकणार आहेस तूच
थोडासा धीर धर आणी
लढत राहा पूर्ण जिद्दीने
विजय तुझाच होणार
शत्रूचा विनाश होणार
ध्वजा विजयाची फडकणार
स्वतंत्र परत तू होणार
संकटं सारीच टळणार
दिवस जुने परत येणार
स्वप्न नव्हे हे सारे
सगळे तसेच घडणार
Sanjay R.

” लव्ह यु बाबा “

बाप पेलतो घराचा भार
आईचा घराला आधार ।

बाप सांगे कर्तव्याचे सार
शिकवी आई सारे संस्कार ।

बाप म्हणजे सर्व आचार
आई तर अंतरीचे विचार ।

बाप खंबीर विचारांचा प्रहार
आई माया ममतेचा आकार ।

बाप म्हणजे घराचे दार
आई देई घराला बहार ।
Sanjay R.

” झाला उध्वस्त संसार “

होता संसार सुखात
क्षणात लोटले दुःखात ।

दिवसभर करून कष्ट
पडायचे घास दोन पोटात ।

आले वादळ कोरोनाचे
झाला संसार उध्वस्त ।

घर गेले वाटा सारल्या
मार्ग घराचा डोळ्यात ।

नाही भय मृत्यूचे परी
जिद्द जगण्याची मनात ।
Sanjay R.

” क्षण जीवनाचा “

क्षण क्षण या जीवनाचा
कठीण झाला किती ।
दिवस सैरवैर फिरण्याचे
स्वप्न सारी झालीत रीती ।

नव्हता कुठला आतंक
नव्हती कुठली भीती ।
क्षणात सरले सारे
थांबली चाकांची गती ।

झाला माणूस निराधार
झाली नात्यांची क्षती ।
बघा आकाश सारे
उरले तेवढेच हाती ।
Sanjay R.

” हृदय मी दिले तुजला “

अंतरात आहेस माझ्या तू
सदा असते विचारात तू ।

तुजविण न सुचे मजला
आहेस माझ्या प्रेमात तू ।

दिवस असो वा रात्र असो
स्वप्नात माझ्या असतेस तू ।

हृदय मी दिले तुजला
झालीस माझे जीवन तू ।

प्रवास आता या जीवनाचा
करू सोबतीने मी आणि तू ।

ऊन असो वा असो पाऊस
अंगणात मनाच्या तूच तू ।

आनंदाची बरसात होता
भिजलेल्या धरेचा गन्ध तू ।
Sanjay R.

” जीव गेला कावून “

तू थांब घरात
मी येतो जाऊन ।
कुठी हाये कोरोना
येतो मी पाहून ।

थकून गेलो आता
घरात मी ऱ्हावून ।
दूर ऱ्हाय दूर ऱ्हाय
पालुपद गाऊन ।

हिंडन न्हाई फिरणं न्हाई
गेलो आता कंटाऊन ।
जवा तवा थेच थे
भौ जीव गेला कावून ।

धा बारा दिस आता
हाये म्हनते अजून ।
जुन्यावानीच होऊ दे
निंगीन सजून धजून ।
Sanjay R.

” एक कप चहा “

फक्त एकच कप चहा
पण देते स्फूर्ती पहा ।
नाही मिळाला तर
दुखते डोकं महा ।

येते जेव्हा तलफ
होतो अस्वस्थ किती ।
एक घुट पिल्यावर
पळते सारीच भीती ।

कडक स्पेशल दुधाचा
पितांना चहा गरमच हवा ।
थंड मात्र झाला तर
नाही कामाची ती दवा ।

पाहुणा असो वा मेहुणा
स्वागत चहानेच करायचे ।
एक कप चहा पाजून
कुठलेही काम काढायचे ।

ओळख पाळख मैत्री नाते
चहाच करतात दृढ ।
आहे अमृत तुल्य हे पेय
असतात उपाय याचे गूढ ।
Sanjay R.

” विजय हा पक्का आहे “

निघालेत सारे लढाया
विजय हा पक्का आहे
थोडासा तर धीर धरा
जगायचे हो परत आहे

बेफाम पणा विसरा आता
नियमांचे तुम्ही पालन करा ।
जीवन होणार कठीण खूप
शिस्तीत तुम्ही वागा जरा ।

विजय तुमचा होणार नक्की
करा मेहनतीने जागा पक्की ।
आनंदाने जगा हो सारे
होऊ नका कुणीच दुःखी ।
Sanjay R.

” विचारच सरले “

सकाळी उठताच
मूड झाला बेकार ।
आता रोजचाच
झाला हा प्रकार ।

दिवस काय नि
रात्र काय ।
विचार डोक्यात
एकच हाय ।

उठणार कधी
ही संचारबंदी ।
विचारांची तर
झाली बुंदी ।

दिवसा पण आता
येतात स्वप्न ।
गोंधळ गर्दी त्यात
स्वतःला जपणं ।

कठीणच वाटतं
स्वछंदी जगणं ।
कुणास ठाऊक
येईल कधी मरणं ।

विचारच सरले
फक्त डोके उरले ।
दिवस जाताहेत
नि डोळे भरले ।
Sanjay R.

” तुटले अंधाराचे जाळे “

झाले आकाश निळे
तुटले अंधाराचे जाळे ।

त्यात ढग काही काळे
वाऱ्यासंगे पुढे पळे ।

सूर्य उगवला तो दूर
लाल त्याचे डोळे ।

निघे भाजून ही धरा
आटले पाण्याचे तळे ।

पाणी ढगात थेंब चार

दुरून किती ते छळे ।

येता पावसच्या सरी
वाहे भरून खळे ।
Sanjay R.

” उंबरठा “

उंबरठा घराचा म्हणजे
मर्यादांची एक रेषा
रेषेच्या आत जीवनाचा श्वास
पडलात बाहेर तर
होईल आपलाच विनाश ।
आत राहूनच मग
ओळखायचे सारे आभास
तोल थोडा जरी गेला तर
मिळेल समाजाचा परिहास ।
उंबरठ्याचे महत्व आहे महान
फक्त मर्यादांचे थोडे ठेवायचे भान ।
Sanjay R.

” व्हायरस “

डिसेंम्बर महिना आला आणि सगळ्यांना येणाऱ्या 2020 वर्षाचे वेध लागले. 31 डिसेम्बरच्या रात्री काय करायचे याचे प्लॅनिंग सुरू झालेत. 2019 वर्ष पूर्णच कामाच्या व्यापात निघून गेले होते .
आता थोडा आराम मिळणार होता. आणि नव वर्ष येणार म्हटल्यावर आनंद उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. पार्टीचे प्लॅनिंग सुरू झाले होते. कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. मेनू आणि व्हेनू ठरवण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि इतर निमंत्रितांची सुद्धा यादी करण्यात आली होती. स्टेज, आणि कलाकार ठरविण्यात आले होते. तसी सगळीच तयारी पूर्णत्वाला आली होती. आता फक्त दिवसांची तेवढी वाट बघायची होती .

डॉक्टर संदीप आणि असिस्टंट नितीन आज काम सम्पवून आरामात बसले होते. नितिन ने नवीन काही रिसर्च रिपोर्ट्स पब्लिश झालेत का म्हणून सर्च इंजिन सुरू केले. एक एक रिपोर्ट डिस्प्ले व्हायला लागले. सगळेच रिपोर्ट जवळ पास जुन्या सारखेच होते. नवीन अस काहीच नव्हते.  सो नितीन ने एक लांब श्वास टाकला आणि तितक्यात मॉनिटर वर रेड अलर्ट डिस्प्ले झाला . साहजिकच नीतीचा लांब श्वास तिथे अडकला आणि तो अलर्ट कशाचा म्हणून त्याने त्यावर क्लीक केले.
रिपोर्ट वाचून त्याला तर एकदम घामच फुटला. चीनच्या ल्याब मधून एक व्हायरस लिक झाला होता आणि. त्या पासून ल्याब मधील लोकांना संक्रमन झाले होते. न्युज कॉन्फिडेनशीअल होती.
त्याने डॉक्टर संदीपला जवळ बोलवले आणि रिपोर्ट वाचायला दिला. डाक्टर संदीप पण अस्वस्थ झाले.
आता काय होणार या चिंतेने दोघेही अस्वस्थ झाले होते.  कुणालाच काही सुचेना . डॉक्टर संदीपनी रिपोर्ट आपल्या हेड ऑफिसला फॉरवर्ड केला. आणि विषय हे गांभीर्य शॉर्टमध्ये लिहून. धोक्याचा संकेत दिला.

चीन ने आपला डाव साधला होता. सम्पूर्ण जगाला विळख्यात घेण्यास चीन सरसावला होता. अमेरिकेने अजून आपली भूमिका स्पस्ट केली नव्हती. सगळेच या धक्क्याने विचलित झाले होते. आपल्या नागरिकांना कसे वाचवायचे या विवंचनेत सगळेच लागले होते. नागरिकांनाही या व्हायरस बद्दल कुठलीच पूर्व कल्पना नसल्याने सगळेच त्याला लाईटली घेत होते, पण देशांच्या प्रमुखांना याची भीषणता लक्षात आली होती . जगातील सगळे डॉक्टर्स, मेडिसिन क्षेत्रातील संशोधक, याना या व्हायरसचा अंदाज आला होता. पण यावर कुठलाच उपचार अजून पर्यंत उपलब्ध नव्हता . त्यामुळे जगावर फार मोठा आघात होणार होता.

डॉक्टर संदीपनी व्हायरस वर संशोधन करण्याचा निर्णय घेतला आणि आपले कार्य सुरू केले.
इंटरनेट वर व्हायरस संबंधात माहिती काढली.
माणसाला इन्फेक्शन झाल्यावर काय सिम्पटोम्स येतात त्याची माहिती काढली. माणसाचा ईमुनिटी पावर कसा कमी होतो याची माहिती मिळवली.
सम्पूर्ण माहिती चे तक्ते तयार केलेत.
अशाच प्रकारच्या अगोदर आलेल्या आजरावर के उपाय होते, त्यांची लक्षण आणि उपचार यांची माहिती काढली.
या व्हायरस च्या पेशन्ट ची लक्षणे सर्दी खोकला असलेल्या पेशन्ट ची लक्षणे जवळपास सारखीच होती , पण होणारे परिणाम मात्र खूपच भयंकर होते. त्यातल्या त्यात बीपी शुगर दमा या आजारच्या पेशन्ट वर या व्हायरस चा प्रभाव फार लवकर होत होता आणि केस निमोनिया पर्यंत पोचत होती. उपायची कुठेच लिंक लागत नव्हती . ईमुनिटी वढवणार्या औषधांचा उपयोग काही केसेस मध्ये उपयोगी ठरते होता तर काही केसेस मध्ये कुठलाच फरक होत नव्हता.
या आजाराला समर्थपणे पेलू शकणारा कुठलाच इलाज अजूनतरी कुणालाच सापडत नव्हता.
सम्पूर्ण जगात उपचारासाठी संशोधन सुरू आहे.
काही देशांनी यात यश मिळवल्याचा दावा सुद्धा केला. असेच प्रयत्न भारतात सुद्धा सुरू आहेत.
आयुर्वेद उपचारांनी ईमुनिटी वाढवायचे बरेच उपचार प्रचलित आहेत. या उपचारांनी भारतीय प्रजा आपली ईमुनिटी वाढवून व्हायरस पडून आपला बचाव करू शकतात. अति इन्फेक्टेड पेशन्ट प्लाजमा थेरपी द्वारा ही बरेच पेशन्ट दुरुस्त झालेत. तसेच हिवतापवर चालणारे औषध क्लोरोक्वीन ही बऱ्याच पेशन्ट ना उपयोगी ठरले.  अजूनही जगभरात संशोधन सुरूच आहेत.
डॉक्टर संदीप आणि त्यांची टीम त्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. आणि त्यांना खात्री आहे की ते नक्कीच यशस्वी होतील.
येणारा काळ नक्कीच हे सिद्ध करेल आणि मानवाचा विजय होईल.
Sanjay R.

” कोरोना युद्ध वीर “

आहे सुरू आता लढाई
करायची कोरोनावर चढाई ।

शिस्तीसाठी पोलीस रस्त्यावर
रुग्णसेवा डॉक्टर आणि नर्सेसवर ।

घरोघरी जाताहेत आशा वर्कर
जवाबदारी मोठी सरकार वर ।

अधिकारी सारे तैनात युद्धावर
भार मोठा आता जनतेवर ।

गरिबांचे तर हाल बेकार
नाही पोटाला कुठलाच आधार ।

पलायन करताहेत मजूर सारे
जिवाच्या भीतीचे वाहताहेत वारे ।
Sanjay R.