” असा कसा मी हा असा ” ( कविता संग्रह )

माझा शेती प्रपंच

 

पप्पा तुम्ही गेलात आणी मग

आली शेती माझ्या हाती ।

 

फिरुन फिरुन बघीतली सारी

काळी भोर तीची माती ।

 

तोलुन मापुन बोलुन सारी

आपलीशी केली सगळी नाती ।

 

डोंगर वाढला कामाचा

कळले मज वळायच्या वाती ।

 

नागरण वखरण पेरणी डवरण

सगळी कामं पावसाच्या घाती ।

 

शोधायचे आकाशात ढग काळे

आणी मोजायचे झाडावर बोंडपाती ।

 

मजुरांचा प्रश्न किती आहे भारी

धाप लागते जिवाला भरुन येते छाती ।

 

डोक्यावर असतो काळजीचा डोंगर

सांगा कशी येयील हो झोप राती ।

 

पावसाचे असते वेगळेच नाटक

नको तेव्हा पडुन धरतो छाती ।

 

बी बियाणे औषध खते

पै पै लागतो हिशोब तरी कीती ।

 

बाजारात मालाला मिळत नाही भाव

फळफळतात नुसत्या व्यपार्यांच्या जाती ।

 

हाती आलेल्या पिकाची हो

बघावी लागते माती ।

 

नका मोजु तुम्ही राजेहो

फाटक्या शर्टाला ठिगळं कीती ।

Sanjay R.

 

 

कापसाला का नाही भाव

 

काय सांगु राव

नाही कापसाला भाव ।

निवडणुकी आधी

किती मारला ताव ।

 

चांगल्या दिवसांची

किती वाट पहाव ।

शेतकरी करतो

किती धावाधाव ।

 

चोर तो माल्या

बनुन बसला साव ।

व्यापार्यांना कीती

पैशाची हाव ।

 

उपाशी पोटी

झोपतो सारा गाव ।

मेहनत करुनही का

त्यानेच असे मराव ।

 

उठा कोणीतरी

सांगा बाजार भाव ।

मंतर द्या म्हणा

नाहीतर दिसेल प्रभाव ।

 

अतीच होतय आता

विसरा घुम जाव ।

जागा झाला बळी तर

उरणार नाही नाव ।

Sanjay R.

 

जिवन प्रवास

 

दिवस तसा आजचा

किती खास आहे .

तुझ्या आणी माझ्या

मिलनाचा हा प्रवास आहे .

 

आठवते ती पहिली भेट

अजुनही तिच आस आहे .

नसतेस ना तु जेव्हा

मनाला तोच ध्यास आहे .

 

गालात तुझे हसणे

आणी हलकेच रागावणे

तोच तर सहवास आहे .

कसा विसरेल ते क्षण

त्यातच माझा श्वास आहे .

 

जपलीत मी ती सारी फुलं

त्याच्यासाठी तु आकाश आहे.

फुलं मुलं काळजी किती

घराला तुझाच सहवास आहे .

 

तु मी आणी आपलं जग

सार्यांचाच तु विश्वास आहे .

रस्ता अजुन सरला नाही

अनंताचा हाच प्रवास आहे .

Sanjay R.

 

 

पावसाची सर

बघुन वाट पावसाची

जीव बळीराजाचा झाला अधर ।

 

सुखावला किती तो

येता एक पावसाची सर ।

 

पाठी कर्जाचा डोंगर

वाटे का होइल त्यात अजुन भर ।

 

पावला बघा देवच जसा

फुलली शेतं आला आनंदाला बहर ।

 

नद्या नाले सारं भरु दे आता

होती सारखी त्याची आकाशी नजर ।

 

हात जोडुन करतो धावा

देवा ढगांचा आकाशी होउ दे गजर ।

Sanjay R.

 

 

आभाळ

आभाळाला लाउन बसला

बळीराजा आपला डोळा ।

 

आकाशातल्या ढगांमधे

शोधतो तो ढग काळा ।

 

हिरमुसलेली शेतं बघुन

हुंदक्याने दाटला गळा ।

 

विखुरताहेत स्वप्न सारी

निघाली आसवं घळघळा ।

 

Sanjay R.

 

 

मनच जळलं

 

कसं कुणास ठाउक

पण आज कळलं ।

 

माणसाचं ना

मनच जळलं ।

 

माणसांनी माणसांना

किती छळलं ।

 

माणुसकी बघुन

सारं जग हळहळलं ।

 

माणसाचं ना

मनच जळलं ।

 

वाटलं होतं

संकट टळलं ।

 

आलेलं तुफान

मागच्या मागे वळलं ।

 

विचारांचं आवरण

कित्ती मळलं ।

 

माणसाचं ना

मनच जळलं ।

Sanjay R.

 

 

पेटते चुल

संसार फाटका

काखेत मुल ।

घालुन फुंकर

पेटते चुल ।

 

डोळ्यात आसवं

विचारांना हुल ।

दिवस रात्र

भुकेला भुल ।

 

स्वप्नात बघते

नवी एक चाहुल ।

गुलाब फुलवतो

काट्यात फुल ।

Sanjay R.

 

 

दी दिवाळी

 

दी दिवाळी

कसली नव्हाळी .

पोटाला हवी

भाजी अन् पोळी .

 

मुल आजारी

नाही त्याला गोळी .

लुटताहेत सारे

लफंग्यांची टोळी

.

बघुन झगमगाट

मन मनातच जळी .

फुलायच्या अगोदर

असते ना कळी

.

चिखल सारा

सागराच्या तळी .

Sanjay R.

 

 

पावसा तुला सलाम

 

पावसा पावसा

नसला तु तर

सार्यांनाच फुटतो घाम ।

 

असाच थोडा

करत तु जा

मधे मधे मुक्काम ।

 

नदी नाले

भरुन थोडे

टाक घेउन आराम ।

 

पीक पाणी

झाडं झुडपं

फुलव निसर्ग तमाम ।

 

केलास ना तु

आता थोडासा मुक्काम

थांबलेत सगळे काम धाम ।

 

करु दे थोडी कामं

तोवर तुला

मिळेल छान आराम ।

 

असाच कधी मधी

जात येत रहा मग

सारेच करतील सलाम ।

Sanjay R.

 

 

दार मरणाचे

 

स्वप्नांच्या या दुनियेत

आहे स्वागत सर्वांचे ।

विचार झालेत स्वैर

राज्य इथे दुष्टांचे ।

 

सफर अंतराळाची करा

घर तिथे चांदण्यांचे ।

भुतलावर चालाल तर

घाव झेला माणसांचे ।

 

आकशी चंद्राची शितलता

धरेवरी सुर्याची प्रखरता ।

विचारांचे बांध तुटले

पुर वाहताहेत रक्तांचे ।

 

आसुसलेली माणसं इथं

वैरी आहेत एकमेकांचे ।

नाही उरले काळीज कुठेच

ढीग लागले प्रेतांचे ।

 

सुर्यावरच जाउ आता

लाकडं वाचतील दहनांचे ।

 

कोण कुणाचा काय लागतो

उघडे दार मरणाचे ।

आसवांना नाही थारा

शब्द गुंजतात हास्याचे ।

Sanjay R

 

 

 

आषाढ वारी

 

मुखी हरी नामाचा गजर

निघाली पंढरपुराला वारी ।

मनात ध्यास विठ्ठलाचा

विसरला तहान भुक सारी ।

 

टाळ मृदंगाच्या नादात पडे पाउल

पुढे जाया हरीच्या द्वारी ।

आज एकादशीचा दिवस

लोटला जन सागर पंढरी ।

 

चंद्रभागेत भिजताच पाय

संचारला मनी उत्साह भारी ।

ओढ लागली दर्शनाची

ठेउनी आला सुख दुःख घरी ।

 

मनी एकच आशा दर्शनाची

बाप माय तुची माझा हरी ।

भाव श्रद्धा देवा तुझ्या ठायी

टेकवतो माथा तुझ्याच पारी ।

 

फिटले याची देहाचे पारणे

सफल झाली जन्माची वारी ।

जय जय हरी जय जय हरी

विठ्ठल हरी विठ्ठल हरी ।

Sanjay R.

 

 

लाव जिव थोडासा

 

असा कसा रे तु माणसा

नको वाटे तुज लेक लाडाची ।

नको करुस असा फरक

देइल तुज सावली झाडाची ।

 

गर्भातच तीचा करीशी अंत

कसा होशील रे तु निवांत ।

जन्मा आधीच घालवतो तु

का मनानं होशील तु शांत ।

 

भेद मुला मुलीचा का करीशी

माया करील कोण तुझशी ।

आसवं पुसाया येयील ती

रडेलही तीच घेउन तुज उशाशी ।

 

नको लोटुस असा रे तीला

आहे प्रेमाची तीच मुरती ।

लाव थोडासा जिव तिजला

करील जिवनाची तुझ्या पुरती ।

Sanjay R.

 

 

कोण मी कुणाची आई

 

कोण मी कुणाची आई

मला तर आता कुणीच नाही ।

 

दोन मुलांना देउनी जन्म

जपले तयासी राई राई ।

 

पंख पसरुनी झेप घेता

उरले पदरी काहीच नाही ।

 

जिव छोटासा कराया मोठा

हसणे रडणे कळले नाही ।

 

बाळ तानुला निजण्यासाठी

रात्री सरल्या करीत गाई ।

 

तहान भुकेचे सारेच केले

स्वप्न पाहुनी दिशा दाही ।

 

पै पै जोडुन शिक्षण केले

उतारवयाला न उरले काही ।

 

मोठ्ठा झाला लेक लाडका

गेला सोडुन बाप आई ।

 

वृद्धाश्रमही नाही नशीबी

काळजी आमची कोण वाही ।

 

अंत घटिका मोजतो देवा

ठेउनी माथा तुझ्या पायी ।

Sanjay R.

 

 

सुई आणी दोरा

काय सांगु दुःख मी दादा

नशीबाचा आहे हा फेरा ।

 

लावले जागोजागी ठिगळं

घेउन सुई अन् दोरा ।

 

नको तानुस तु जास्त

होइल उघडा सारा पसारा ।

 

नाही सरणार दुःख माझी

नियतीचा हाच इशारा ।

 

काळ्या अंधारात शोधतो मी

माझ्या मनातला तारा ।

 

देवा उगवतीच्या सुर्या संगे

होवु दे जिवनात प्रकाश सारा ।

Sanjay R.

 

 

जिवनाची जोड

 

नाही खाण्यास गोड धोड

पोर बघा हो झाली कशी रोड ।

पैसा पैसा का असा

त्याची कशी जिवनाशी जोड ।

 

नाही जुळले माझे तया

नाही गवसली कुठे तोड ।

पाहतो सार्या दीशा असा मी

सारेच करती लुटायची होड ।

 

देतो सोडुन आता सारे

नाही पेलवत मजला लोड ।

पाश उलटले जिवनाचे आता

फंदा वेडावतो कसा बेजोड ।

 

सरली आसवं डोळ्यातली

पेटु दे चीता दुर सार गिधाडं ।

नको रडउस तान्हुल्यासी

हसाया देजो धाडुन एक झाड ।

Sanjay R.

 

 

वर्हाडी ठेचा

 

काल गेलो होतो

मी एका आफीसात ।

सरकारी हाफीस ते

सारेच होते बंदोबस्तात ।

 

बाबु पाशी गेलो

मनलं काम कवा होइन ।

म्हनते कसा बाबु

भेटन वेळ तवा मी पाइन ।

 

मनलं बाबुले पहानजी जरा

महीने झाले नाइन। ।

तो म्हने भेट मंग

रात्री घेउ थोडी वाइन ।

 

म्या म्हनलं मंग

देतो न जी क्वाइन ।

रात्री भेटशीन त

उद्या काम तुहं होइन ।

 

नियमच हाये तसा

काय काय मी पाहीन ।

रात्र झाली जंगी

निपटलं काम बहीन ।

 

फालतुच होतो बसला

कामाची कीती वाइन ।

Sanjay R

 

 

घरटे सुखाचे

 

देवु कसा मी ओ

तुझ्या आर्त हाकेला ।

मनाच्या खोलात तु

आहेस सदा साथीला ।

 

आठवणींच्या विश्वात

वीणले प्रीतीचे जाळे ।

भरुन आले बघ अंबर

ढग निळे काळे ।

 

साठला पूर आसवांचा

भिजले तयात डोळे ।

पुसाया शोधतो मी आता

उघड तुच ताळे ।

 

तुझ्या शिवाय नाही काही

माझा मीच म्हणायला ।

साथ मज तुझी हवी

घरटे सुखाचे विणायला ।

Sanjay R.

 

 

विसरलो हसणं

 

खरच का विसरलो

आम्ही हसणं ।

आपलसं केलय

तणावात असणं ।

 

प्रगतीच्या वाटेवर

का नुसतच जगणं ।

कपाळावर आठ्या

आणी विचारात फसणं ।

 

जगाच्या यादीत

कुठेच नसणं ।

चिंताच सार्या आणी

श्वास ढकलणं ।

 

कुठवर चालायचं

खोलात रुतणं ।

द्याना कोणी

हास्य उसणं ।

 

नाहीतर होइल

असुन नसणं ।

Sanjay R.

 

 

वय म्हातारं

 

तुटला संसार

मोडले घर ।

सारे जिवन

झाले अधर ।

 

पाणावलेले डोळे

झुकली नजर ।

त्राण सरले

मनात थरथर ।

 

टेकले हात

झुकले अंबर ।

वय वर्ष

झाले शंभर ।

 

जगलो वाचलो

कुणास कदर ।

नाही उरला

शेला पदर ।

 

नाती गोती

मायेची पाखरं ।

नको कुणालाच

घरात म्हातारं ।

 

इच्छाच सरल्या

नको वाटतं सारं ।

वेध लागले आता

जायचे वर ।

Sanjay R.

 

 

उजाड धरा

 

तोच चंद्र तोच तारा

झोंझावत येणारा

वादळी वारा ।

 

सागराचा कधी

तर नदीचा किनारा ।

पक्षांची किलबील

सृष्टीचा नजारा ।

 

जिकडे तिकडे त्यात

माणसांचा पसारा ।

जशा ओसंडुन वाहणार्या

पावसाच्या धारा ।

 

सोबतीला जिवघेण्या

टप्पोर्या गारा ।

थकली भागली

उजाड धरा ।

 

थोडासा विचार

सारेच करा ।

संपलं हे सारं तर

काय असेल तर्हा ।

 

थांबवा पर्यावरणाशी

खेळणे जरा ।

Sanjay R.

 

 

 

माझे घर

 

इमारती चढताहेत आकाशी वर

रहायला नाही आम्हा छोटेसे घर ।

 

तुटके फुटके नावाला छप्पर

भिजउन जाते पावसाची सर ।

 

नाहित भिंती झोपडी ही अधर

झुळकीनं वार्याच्या होते थर थर ।

 

दोन हात जागेत चललाय बसर

गरिबाच्या जगण्याची कुणास कदर ।

 

दिवस रात्र चालतो कष्टाचा नागर

तरी फाटकाच आहे साडीचा पदर ।

 

दोन हजार विस पर्यंत सार्यांना घर

लाउन बसलोय तिकडेच मी नजर

Sanjay R.

 

 

जगत्दात्री मी

 

कोण मी काय नाते तुजशी माझे

होउनी अर्धांगिणी जपते स्वप्न तुझे ।

 

कुणाची मी बहिण कुणाची माता

त्यागाची धरुनी मशाल जळते स्वताः ।

 

जगत्दात्री मी या धरेची गाथा

सोसते दुःख सारे पदरात व्यथा ।

 

आसवांच्या सागरातले मी कमळ

झेलुनी मार लाटांचा आहे अढळ ।

Sanjay R.

 

 

 

रोषणाई

1

रंग जिवनाचे कीती काही

झोपडीत काळा अंधार

आणी महाली रोषणाई ।

 

कुणाच्या शर्टाला टाई

कुणास पांघराया नाही काही ।

 

फिरतो वणवण दीशा दाही

कुणी गेला वाया पैशा पाई ।

 

कुणा भुके विना झोप नाही

कुणी वेडा व्यसनाच्या ठाई ।

 

ज्योत दिव्याची जळत जाई

कहाणी ओल्या शब्दांची शाई ।

Sanjay R.

 

 

पपी लाडाचा

लेकीला माझ्या

पिल्लाचं वेड ।

ए बी सी डी टु

एक्स वाय झेड ।

 

दिवसभर असते

पपीच्या मागे ।

निरागस मनाचे

अतुट धागे ।

 

दुधातले दुध आणी

पोळीतली पोळी ।

सारखेच तिच्या

भरवते वेळी ।

 

दुपारची मस्ती

पपीला पांघरुण ।

शाळेला जाते

काळजीचे सांगुण ।

 

झोपेतही विचारते

झोपला का पपी ।

हो कळताच ती

होते हॅप्पी

 

दिवस उजाडताच

पपीची आठवण ।

बघतो वाट

तिचीच तो पण ।

 

छोटी छोटी मनं

आणी प्रेमाचे क्षण ।

असाच घडावा

प्रत्येक जण ।

Sanjay R.

 

 

बळीराजाची व्यथा

 

बळिराजा तु, नाही तुज

उन्हा तान्हाची फिकीर ।

पान्या पावसाशी तुझी

किती जुळली लकीर ।

 

उपसतो कष्ट किती

होतोस तु अधीर ।

पावसाच्या वाटेवर

नजर लागे भीर भीर ।

 

वेडावती ढग तुला

कधी होतो मग उशीर ।

कधी होतो पुर पाणी

तुटतो जिवाचा धीर ।

 

निसर्गाच्या हाती सारे

सोसतो सारे तीर ।

चंदना वाणी झिजतो

गड्या तुच शुर वीर ।

 

चिंता वाहतो दुनीयेची

अर्धपोटी तुझा संसार ।

लेतो शिउन फाटके

परी दिव्याखाली अंधार ।

Sanjay R.

 

 

परतीच्या वाटेवर

 

आहे हा वळणा वळणांचा थाट

कशी ही खाचखळग्यांची वाट ।

टाकले पहीले पाउल तेव्हा मी

नव्हता आधार कशात ।

 

पडलो झडलो आणी उठलो

हाती आई बाबांचा होता हात ।

उभा ठाकलो मी पायांवर तेव्हा

रोजच होती एक नवी पहाट ।

 

घातली पालथी दुनीया सारी

शोधला आनंद मी तयात ।

दुर पाहीले मृगजळ सुखाचे

झाले जेव्हा दोनाचे सहा हात ।

 

नव्हती उसंत मज एक क्षणाची

जशी सागरात उठणारी लाट ।

नाही उरला त्राण क्षीण झाले श्वास

शोधतो मी आता माझी परतीची वाट ।

Sanjay R.

 

 

 

माझा शेती प्रपंच

 

पप्पा तुम्ही गेलात आणी मग

आली शेती माझ्या हाती ।

 

फिरुन फिरुन बघीतली सारी

काळी भोर तीची माती ।

 

तोलुन मापुन बोलुन सारी

आपलीशी केली सगळी नाती ।

 

डोंगर वाढला कामाचा

कळले मज वळायच्या वाती ।

 

नागरण वखरण पेरणी डवरण

सगळी कामं पावसाच्या घाती ।

 

शोधायचे आकाशात ढग काळे

आणी मोजायचे झाडावर बोंडपाती ।

 

मजुरांचा प्रश्न किती आहे भारी

धाप लागते जिवाला भरुन येते छाती ।

 

डोक्यावर असतो काळजीचा डोंगर

सांगा कशी येयील हो झोप राती ।

 

पावसाचे असते वेगळेच नाटक

नको तेव्हा पडुन धरतो छाती ।

 

बी बियाणे औषध खते

पै पै लागतो हिशोब तरी कीती ।

 

बाजारात मालाला मिळत नाही भाव

फळफळतात नुसत्या व्यपार्यांच्या जाती ।

 

हाती आलेल्या पिकाची हो

बघावी लागते माती ।

 

नका मोजु तुम्ही राजेहो

फाटक्या शर्टाला ठिगळं कीती ।

Sanjay R.

 

 

कापसाला का नाही भाव

 

काय सांगु राव

नाही कापसाला भाव ।

निवडणुकी आधी

किती मारला ताव ।

 

चांगल्या दिवसांची

किती वाट पहाव ।

शेतकरी करतो

किती धावाधाव ।

 

चोर तो माल्या

बनुन बसला साव ।

व्यापार्यांना कीती

पैशाची हाव ।

 

उपाशी पोटी

झोपतो सारा गाव ।

मेहनत करुनही का

त्यानेच असे मराव ।

 

उठा कोणीतरी

सांगा बाजार भाव ।

मंतर द्या म्हणा

नाहीतर दिसेल प्रभाव ।

 

अतीच होतय आता

विसरा घुम जाव ।

जागा झाला बळी तर

उरणार नाही नाव ।

Sanjay R.

 

जिवन प्रवास

 

दिवस तसा आजचा

किती खास आहे .

तुझ्या आणी माझ्या

मिलनाचा हा प्रवास आहे .

 

आठवते ती पहिली भेट

अजुनही तिच आस आहे .

नसतेस ना तु जेव्हा

मनाला तोच ध्यास आहे .

 

गालात तुझे हसणे

आणी हलकेच रागावणे

तोच तर सहवास आहे .

कसा विसरेल ते क्षण

त्यातच माझा श्वास आहे .

 

जपलीत मी ती सारी फुलं

त्याच्यासाठी तु आकाश आहे.

फुलं मुलं काळजी किती

घराला तुझाच सहवास आहे .

 

तु मी आणी आपलं जग

सार्यांचाच तु विश्वास आहे .

रस्ता अजुन सरला नाही

अनंताचा हाच प्रवास आहे .

Sanjay R.

 

 

पावसाची सर

बघुन वाट पावसाची

जीव बळीराजाचा झाला अधर ।

 

सुखावला किती तो

येता एक पावसाची सर ।

 

पाठी कर्जाचा डोंगर

वाटे का होइल त्यात अजुन भर ।

 

पावला बघा देवच जसा

फुलली शेतं आला आनंदाला बहर ।

 

नद्या नाले सारं भरु दे आता

होती सारखी त्याची आकाशी नजर ।

 

हात जोडुन करतो धावा

देवा ढगांचा आकाशी होउ दे गजर ।

Sanjay R.

 

 

आभाळ

आभाळाला लाउन बसला

बळीराजा आपला डोळा ।

 

आकाशातल्या ढगांमधे

शोधतो तो ढग काळा ।

 

हिरमुसलेली शेतं बघुन

हुंदक्याने दाटला गळा ।

 

विखुरताहेत स्वप्न सारी

निघाली आसवं घळघळा ।

 

Sanjay R.

 

 

मनच जळलं

 

कसं कुणास ठाउक

पण आज कळलं ।

 

माणसाचं ना

मनच जळलं ।

 

माणसांनी माणसांना

किती छळलं ।

 

माणुसकी बघुन

सारं जग हळहळलं ।

 

माणसाचं ना

मनच जळलं ।

 

वाटलं होतं

संकट टळलं ।

 

आलेलं तुफान

मागच्या मागे वळलं ।

 

विचारांचं आवरण

कित्ती मळलं ।

 

माणसाचं ना

मनच जळलं ।

Sanjay R.

 

 

पेटते चुल

संसार फाटका

काखेत मुल ।

घालुन फुंकर

पेटते चुल ।

 

डोळ्यात आसवं

विचारांना हुल ।

दिवस रात्र

भुकेला भुल ।

 

स्वप्नात बघते

नवी एक चाहुल ।

गुलाब फुलवतो

काट्यात फुल ।

Sanjay R.

 

 

दी दिवाळी

 

दी दिवाळी

कसली नव्हाळी .

पोटाला हवी

भाजी अन् पोळी .

 

मुल आजारी

नाही त्याला गोळी .

लुटताहेत सारे

लफंग्यांची टोळी

.

बघुन झगमगाट

मन मनातच जळी .

फुलायच्या अगोदर

असते ना कळी

.

चिखल सारा

सागराच्या तळी .

Sanjay R.

 

 

पावसा तुला सलाम

 

पावसा पावसा

नसला तु तर

सार्यांनाच फुटतो घाम ।

 

असाच थोडा

करत तु जा

मधे मधे मुक्काम ।

 

नदी नाले

भरुन थोडे

टाक घेउन आराम ।

 

पीक पाणी

झाडं झुडपं

फुलव निसर्ग तमाम ।

 

केलास ना तु

आता थोडासा मुक्काम

थांबलेत सगळे काम धाम ।

 

करु दे थोडी कामं

तोवर तुला

मिळेल छान आराम ।

 

असाच कधी मधी

जात येत रहा मग

सारेच करतील सलाम ।

Sanjay R.

 

 

दार मरणाचे

 

स्वप्नांच्या या दुनियेत

आहे स्वागत सर्वांचे ।

विचार झालेत स्वैर

राज्य इथे दुष्टांचे ।

 

सफर अंतराळाची करा

घर तिथे चांदण्यांचे ।

भुतलावर चालाल तर

घाव झेला माणसांचे ।

 

आकशी चंद्राची शितलता

धरेवरी सुर्याची प्रखरता ।

विचारांचे बांध तुटले

पुर वाहताहेत रक्तांचे ।

 

आसुसलेली माणसं इथं

वैरी आहेत एकमेकांचे ।

नाही उरले काळीज कुठेच

ढीग लागले प्रेतांचे ।

 

सुर्यावरच जाउ आता

लाकडं वाचतील दहनांचे ।

 

कोण कुणाचा काय लागतो

उघडे दार मरणाचे ।

आसवांना नाही थारा

शब्द गुंजतात हास्याचे ।

Sanjay R

 

 

 

आषाढ वारी

 

मुखी हरी नामाचा गजर

निघाली पंढरपुराला वारी ।

मनात ध्यास विठ्ठलाचा

विसरला तहान भुक सारी ।

 

टाळ मृदंगाच्या नादात पडे पाउल

पुढे जाया हरीच्या द्वारी ।

आज एकादशीचा दिवस

लोटला जन सागर पंढरी ।

 

चंद्रभागेत भिजताच पाय

संचारला मनी उत्साह भारी ।

ओढ लागली दर्शनाची

ठेउनी आला सुख दुःख घरी ।

 

मनी एकच आशा दर्शनाची

बाप माय तुची माझा हरी ।

भाव श्रद्धा देवा तुझ्या ठायी

टेकवतो माथा तुझ्याच पारी ।

 

फिटले याची देहाचे पारणे

सफल झाली जन्माची वारी ।

जय जय हरी जय जय हरी

विठ्ठल हरी विठ्ठल हरी ।

Sanjay R.

 

 

लाव जिव थोडासा

 

असा कसा रे तु माणसा

नको वाटे तुज लेक लाडाची ।

नको करुस असा फरक

देइल तुज सावली झाडाची ।

 

गर्भातच तीचा करीशी अंत

कसा होशील रे तु निवांत ।

जन्मा आधीच घालवतो तु

का मनानं होशील तु शांत ।

 

भेद मुला मुलीचा का करीशी

माया करील कोण तुझशी ।

आसवं पुसाया येयील ती

रडेलही तीच घेउन तुज उशाशी ।

 

नको लोटुस असा रे तीला

आहे प्रेमाची तीच मुरती ।

लाव थोडासा जिव तिजला

करील जिवनाची तुझ्या पुरती ।

Sanjay R.

 

 

कोण मी कुणाची आई

 

कोण मी कुणाची आई

मला तर आता कुणीच नाही ।

 

दोन मुलांना देउनी जन्म

जपले तयासी राई राई ।

 

पंख पसरुनी झेप घेता

उरले पदरी काहीच नाही ।

 

जिव छोटासा कराया मोठा

हसणे रडणे कळले नाही ।

 

बाळ तानुला निजण्यासाठी

रात्री सरल्या करीत गाई ।

 

तहान भुकेचे सारेच केले

स्वप्न पाहुनी दिशा दाही ।

 

पै पै जोडुन शिक्षण केले

उतारवयाला न उरले काही ।

 

मोठ्ठा झाला लेक लाडका

गेला सोडुन बाप आई ।

 

वृद्धाश्रमही नाही नशीबी

काळजी आमची कोण वाही ।

 

अंत घटिका मोजतो देवा

ठेउनी माथा तुझ्या पायी ।

Sanjay R.

 

 

सुई आणी दोरा

काय सांगु दुःख मी दादा

नशीबाचा आहे हा फेरा ।

 

लावले जागोजागी ठिगळं

घेउन सुई अन् दोरा ।

 

नको तानुस तु जास्त

होइल उघडा सारा पसारा ।

 

नाही सरणार दुःख माझी

नियतीचा हाच इशारा ।

 

काळ्या अंधारात शोधतो मी

माझ्या मनातला तारा ।

 

देवा उगवतीच्या सुर्या संगे

होवु दे जिवनात प्रकाश सारा ।

Sanjay R.

 

 

जिवनाची जोड

 

नाही खाण्यास गोड धोड

पोर बघा हो झाली कशी रोड ।

पैसा पैसा का असा

त्याची कशी जिवनाशी जोड ।

 

नाही जुळले माझे तया

नाही गवसली कुठे तोड ।

पाहतो सार्या दीशा असा मी

सारेच करती लुटायची होड ।

 

देतो सोडुन आता सारे

नाही पेलवत मजला लोड ।

पाश उलटले जिवनाचे आता

फंदा वेडावतो कसा बेजोड ।

 

सरली आसवं डोळ्यातली

पेटु दे चीता दुर सार गिधाडं ।

नको रडउस तान्हुल्यासी

हसाया देजो धाडुन एक झाड ।

Sanjay R.

 

 

वर्हाडी ठेचा

 

काल गेलो होतो

मी एका आफीसात ।

सरकारी हाफीस ते

सारेच होते बंदोबस्तात ।

 

बाबु पाशी गेलो

मनलं काम कवा होइन ।

म्हनते कसा बाबु

भेटन वेळ तवा मी पाइन ।

 

मनलं बाबुले पहानजी जरा

महीने झाले नाइन। ।

तो म्हने भेट मंग

रात्री घेउ थोडी वाइन ।

 

म्या म्हनलं मंग

देतो न जी क्वाइन ।

रात्री भेटशीन त

उद्या काम तुहं होइन ।

 

नियमच हाये तसा

काय काय मी पाहीन ।

रात्र झाली जंगी

निपटलं काम बहीन ।

 

फालतुच होतो बसला

कामाची कीती वाइन ।

Sanjay R

 

 

घरटे सुखाचे

 

देवु कसा मी ओ

तुझ्या आर्त हाकेला ।

मनाच्या खोलात तु

आहेस सदा साथीला ।

 

आठवणींच्या विश्वात

वीणले प्रीतीचे जाळे ।

भरुन आले बघ अंबर

ढग निळे काळे ।

 

साठला पूर आसवांचा

भिजले तयात डोळे ।

पुसाया शोधतो मी आता

उघड तुच ताळे ।

 

तुझ्या शिवाय नाही काही

माझा मीच म्हणायला ।

साथ मज तुझी हवी

घरटे सुखाचे विणायला ।

Sanjay R.

 

 

विसरलो हसणं

 

खरच का विसरलो

आम्ही हसणं ।

आपलसं केलय

तणावात असणं ।

 

प्रगतीच्या वाटेवर

का नुसतच जगणं ।

कपाळावर आठ्या

आणी विचारात फसणं ।

 

जगाच्या यादीत

कुठेच नसणं ।

चिंताच सार्या आणी

श्वास ढकलणं ।

 

कुठवर चालायचं

खोलात रुतणं ।

द्याना कोणी

हास्य उसणं ।

 

नाहीतर होइल

असुन नसणं ।

Sanjay R.

 

 

वय म्हातारं

 

तुटला संसार

मोडले घर ।

सारे जिवन

झाले अधर ।

 

पाणावलेले डोळे

झुकली नजर ।

त्राण सरले

मनात थरथर ।

 

टेकले हात

झुकले अंबर ।

वय वर्ष

झाले शंभर ।

 

जगलो वाचलो

कुणास कदर ।

नाही उरला

शेला पदर ।

 

नाती गोती

मायेची पाखरं ।

नको कुणालाच

घरात म्हातारं ।

 

इच्छाच सरल्या

नको वाटतं सारं ।

वेध लागले आता

जायचे वर ।

Sanjay R.

 

 

उजाड धरा

 

तोच चंद्र तोच तारा

झोंझावत येणारा

वादळी वारा ।

 

सागराचा कधी

तर नदीचा किनारा ।

पक्षांची किलबील

सृष्टीचा नजारा ।

 

जिकडे तिकडे त्यात

माणसांचा पसारा ।

जशा ओसंडुन वाहणार्या

पावसाच्या धारा ।

 

सोबतीला जिवघेण्या

टप्पोर्या गारा ।

थकली भागली

उजाड धरा ।

 

थोडासा विचार

सारेच करा ।

संपलं हे सारं तर

काय असेल तर्हा ।

 

थांबवा पर्यावरणाशी

खेळणे जरा ।

Sanjay R.

 

 

 

माझे घर

 

इमारती चढताहेत आकाशी वर

रहायला नाही आम्हा छोटेसे घर ।

 

तुटके फुटके नावाला छप्पर

भिजउन जाते पावसाची सर ।

 

नाहित भिंती झोपडी ही अधर

झुळकीनं वार्याच्या होते थर थर ।

 

दोन हात जागेत चललाय बसर

गरिबाच्या जगण्याची कुणास कदर ।

 

दिवस रात्र चालतो कष्टाचा नागर

तरी फाटकाच आहे साडीचा पदर ।

 

दोन हजार विस पर्यंत सार्यांना घर

लाउन बसलोय तिकडेच मी नजर

Sanjay R.

 

 

जगत्दात्री मी

 

कोण मी काय नाते तुजशी माझे

होउनी अर्धांगिणी जपते स्वप्न तुझे ।

 

कुणाची मी बहिण कुणाची माता

त्यागाची धरुनी मशाल जळते स्वताः ।

 

जगत्दात्री मी या धरेची गाथा

सोसते दुःख सारे पदरात व्यथा ।

 

आसवांच्या सागरातले मी कमळ

झेलुनी मार लाटांचा आहे अढळ ।

Sanjay R.

 

 

 

रोषणाई

1

रंग जिवनाचे कीती काही

झोपडीत काळा अंधार

आणी महाली रोषणाई ।

 

कुणाच्या शर्टाला टाई

कुणास पांघराया नाही काही ।

 

फिरतो वणवण दीशा दाही

कुणी गेला वाया पैशा पाई ।

 

कुणा भुके विना झोप नाही

कुणी वेडा व्यसनाच्या ठाई ।

 

ज्योत दिव्याची जळत जाई

कहाणी ओल्या शब्दांची शाई ।

Sanjay R.

 

 

पपी लाडाचा

लेकीला माझ्या

पिल्लाचं वेड ।

ए बी सी डी टु

एक्स वाय झेड ।

 

दिवसभर असते

पपीच्या मागे ।

निरागस मनाचे

अतुट धागे ।

 

दुधातले दुध आणी

पोळीतली पोळी ।

सारखेच तिच्या

भरवते वेळी ।

 

दुपारची मस्ती

पपीला पांघरुण ।

शाळेला जाते

काळजीचे सांगुण ।

 

झोपेतही विचारते

झोपला का पपी ।

हो कळताच ती

होते हॅप्पी

 

दिवस उजाडताच

पपीची आठवण ।

बघतो वाट

तिचीच तो पण ।

 

छोटी छोटी मनं

आणी प्रेमाचे क्षण ।

असाच घडावा

प्रत्येक जण ।

Sanjay R.