” लग्नातली तर मजाच गेली “

लॉक डाऊन,  लॉक डाऊन. कुठे जाणे नाही, कुठे येणे नाही. घरात बसा, टी व्ही पहा. टाइम पास करा. याशिवाय काहीच काम उरले नाही. मागच्या आठवड्यात मी गावाला जाऊन आलो. सहज फेर फटका मारावा म्हणून शेतावर जाऊन आलो. तर तिकडे आमच्या गावाचा रुप्या भेटला. तोच माझ्या जवळ आला नि बसला ओट्यावर. मी विचारलं काय चाललंय रुपराव. काही नाही जी. दिवस भर आपलं काम करावं रातच्याले घरी जाऊन जेवन खावन करून झोपावं बस हेच सुरू हाये आता. बहिन गावात वीसेक लग्न झाले भाऊ पर एकबी लग्नाले जाले न्हाई भेटलं . दोन वर्षापासून हेच होऊन रायलं. कवा जाईन ह्या  कोरोना, कोणास ठाव. सारी मजाच गेली जी. मलाही आश्चर्यच वाटले , बापरे वीसेक लग्न झाले का गावात. बरेच लग्न झाले. मलाही हा आकडा नव्हता माहीत. तसा रुप्या बोलला,  हो ना जी. मग त्याने एक एकाचे नाव घेऊन मोजणे चालू केले तर खरच मोजून वीस लग्न भरले. पहा जी एवढे लग्न होऊन एकबी लग्नाची हवा नाही  लागली पहा बर. त्याचे म्हणणे बरोबर होते. इतके लग्न होऊन ही दोन चारच लग्नाची माहिती आमंत्रण मला मिळाले होते. बाकी सारे जुळले कुठे, झाले केव्हा काही पत्ताच लागला नव्हता. लोक तरी काय करणार . वीस पंचवीस लोकांत लग्न आटोपणे काही साधी गोस्ट नव्हती. लग्नात हजर राहायला आई वडील, काका, मामा,  भाऊ बहीण, त्यांचा परिवार जरी मोजला तरी पन्नास पार होत होता. आणि परवानगी फक्त दहा ची मग काय करणार . कसे तरी नवरदेव नवरी तयार करायचे. जाऊन एक तासात स्वाहा स्वाहा करून परत फिरायचे. करण सकाळी सात ते अकरा याच वेळेत सगळे आटोपून परत आपल्या घरी पोहचायला हवे ही अट होतीच. त्यासाठी लग्नाचा मुहूर्त मुद्दाम सात साडे सात ठेवायचा. लग्न लागत नाही तर जेवण किंवा फक्त नास्ता करून वर्हाडी रवाना करायचे. जेवणही किती तर वीस पंचवीस लोकांचे. ते तर घरचेच लोक तेवढे जुळायचे. करणार तरी काय. तसा रुप्या बोलला आजी त्या दिलप्याच लग्न झालं ना त बहिन, वऱ्हाडयायले निस्ता मुरमुर्याचा चिवडच दिला जी. जेवनबी त्यायच्या नशिबी नाही आलं. याले बी का लगन म्हणावं .  सारे वर्हाडी उपाशी तापाशी गेले न तसेच वापस आले. एकदम रातच्याले पूजा पाती करूनच जेवले मंग. हे कोनच लग्न म्हणावं. त्याची गोष्ट ऐकून मलाही थोडे वाईटच वाटले. मग मी रुपराव ची फिरकी घ्यावी म्हणून त्याला म्हणालो. रुपराव दोन वर्षांपासून तुमची वांग्याच्या भाजी शी त गाठ भेटच नसन. तसा रुपराव म्हणाला , आजी खरच हाये, बहिन दोन वर्ष पासून पंगतीत बसून वांग्याची भाजी, कढी, आन भजे तोंडालेच लागले नाही. आता निस्ती आठोन येते जी. देवस्थानचे भांडेबी वाट पाहून रायले. मोठं मोठे गंज पराती कोणी नेतच न्हाई. घरच्या भांड्यातच सारं लग्न होऊन जाते. गोष्ट खरीच होती. लोकांना बोलवा गर्दी करा नि पोलीस आले तर दंड भरा. म्हणून कोणी कोणाला लग्न कर्यक्रमात बोलवत पण नव्हते. पण एक बर झालं जी गरीबायचे लग्न मस्त कमी खर्चात आटोपले. बिचारे कर्जबाजरी न्हाई झाले. ते लय खुश हायेत.
हे मात्र खरं होतं. कर्ज काढून, शेत विकून ज्यांना लग्न करावे लागत होते. तास प्रसंग मात्र या दोन वर्षात कुणावर आला नव्हता. आनंदी आनंद होता.

” जीव टाकला ओवाळून “

जीवाची आहे कोणास चिंता
टाकला ओवाळून तुझ्या वर ।
सोबत तुझी असू दे सदाची
बांधायचे मज तुझे माझे घर ।
दिवस असो वा रात्र काळोखी
स्वप्नातही असतो तुझाच वावर ।
आठवणींच्या डोहात फिरतो
तुझ्याविना जातो कुठे हा प्रहर ।
थांबतील हे श्वास जरी माझे
पडेल कसा मज सांग तुझा विसर ।
Sanjay R.





” कुठे काय चुकलं होतं “

कुठे काय चुकलं होतं
बरोबर तर तुझंच होत ।

झालाना विनाश सारा
होता  कुठे कुणाचा पहारा ।

ठरवलेले तर होतच नाही
अपयशाने होते लाही लाही ।

सांगा कोणी कसे वागायचे  ।
भोग नशिबाचे तर भोगायचे ।
Sanjay R.

” काय होतं हवं “

काय होतं हवं, काय होतं नको
सांगतो तुला, नाही कळल मला ।
करतो विचार,  बदलतात आचार
सांगतो तुला, नाही कळल मला ।
विचारांनी थकलो, मी आता हरलो
सांगतो तुला, नाही कळल मला ।
श्वास झाले मंद, पडेल हृदय बंद
सांगतो तुला, नाही कळल मला ।
दूर जळते चिता, म्हणे कशास भिता
सांगतो तुला, नाही कळल मला ।
आले यमाचे दूत, सांगे आहे मी भूत
सांगतो तुला, नाही कळल मला ।
हवी मज मुक्ती, मनात तुझी भक्ती
सांगतो तुला, नाही कळल मला ।
येईल मी परत, आली वेळ सरत
सांगतो तुला, नाही कळल मला ।
नको आता ध्यास, मृत्यूचा भास
सांगतो तुला, नाही कळल मला ।
जीवन हे अमर, आजण मी भ्रमर
सांगतो तुला, नाही कळल मला ।
Sanjay R.

आता काहीच नाही सुचत

” व्यथा एका रुग्णाची “

बेडवरच आहे मी पडून
नाही काहीच आता सुचत ।

सारखे मनात येतात विचार
वाटतं आता नाही मी वाचत ।

आयुष्यभर कष्ट करून हो
थोडीशी केली होती बचत ।

सरली सारी या दवाखान्यात
मनही चालले आता खचत ।

उशाखाली जरा बघा माझ्या
बिलं कशी चालली साचत ।

जीवनाचाच हो खेळ  झाला
भूत कोरोनाचे आहे नाचत ।
Sanjay R.

” आपुलकी तर कायम राहील “

मतांमध्ये जरी असतील भेद
आपुलकी तर कायम राहील ।

दूर जरी तू गेलीस कितीही
अंतरातच मग तुला पाहिल ।

आहे देव कुठे कुणास ठाऊक
पुष्प प्रतिमेस रोज वाहील ।

भाव तुझ्यावर जडला माझा
तुझ्या शिवाय कसा जाईल ।
Sanjay R.

” सांगतो मी परत “

सांगतो मी परत
काय तुझे इरादे ।
विसरलीस कशी तू
केलेले सारेच वादे ।
विसरेल कसा मी
अंतरातली ती यादे ।
आठवण कर जरासी
उजळा स्मृतींना तू दे ।
म्हणायचीस कृष्ण मी
व्हायचीस तू राधे ।
Sanjay R.

” मनावर सय्यम माझा “

सोडू नकोस ताबा
मनावर सय्यम माझा ।
सुचेना मजला काही
जीव तुजवर माझा ।
बघतो स्वप्न किती मी
वाटे त्यात मीच राजा ।
राणी तू ग आहे माझी
मनात भाव नाही दुजा ।
Sanjay R.

” आवडती माझी शाळा “

अजूनही आहे मला
तिचा खूप लळा ।
दुसरी कोणी नाही ती
आहे माझीच शाळा ।
वेळ होताच शाळेची
व्हायची पळा पळा ।
प्रार्थनेसाठी ग्राउंड वर
व्हायचे सारे गोळा ।
नंतर व्हायचे पिरेड
नियम गुरुजींचे पाळा ।
दंगा मस्ती करतच मग
अभ्यासाकडे वळा ।
चुकवण्या मार गुरुजींचा
नको ते सारे टाळा ।
नसेल केला अभ्यास तर
मित्रांना खूप छळा ।
नसेल केला गृहपाठ तर
कोरडा पडायचा गळा ।
तरीही शाळेचा आम्हास
होता खूपच लळा ।
Sanjay R.

” करू मी पर्वा कशाची “

करू मी पर्वा कशाची
अवस्था कशी मनाची ।
असंख्य विचारांचे चक्र
वेळच नाही थांबायची ।
गुरफटलेले मी हा असा
वाट मिळेना निघायची ।
आहे क्षितिज दूर किती
इच्छा आहे चालायची ।
साथ हवी तुझीच मज
सम्पेल वाट जीवनाची ।
Sanjay R.

” अलिप्त कसं जगायचं “

अलिप्त कसं जगायचं
दूर जरा कसं जायचं ।
मनात प्रीतीचा आहे गंध
कसं त्यास समजवायचं ।
होते जाणीव मला सारी
सांग तुला कसं सांगायचं ।
ओठात शब्दांचे भांडार
बोल ते कसे थांबवायचे ।
नेत्रही आहेत आतुर किती
नजरेला किती झाकायचं ।
सोडून सारेच विचार मग
चला जीवन छान जगायचं ।
Sanjay R.

” अपेक्षा कशाची आता करावी “

अपेक्षा कशाची आता करावी
काटेरी वाटेवर फुले उमलावी ।

रणरणत्या उन्हात फिरताना
वाऱ्याची थंड झुळूक यावी ।

घामाने ओथंम्बलेल्या शरीरावर
निसर्गाने फुंकर हळूच घालावी ।

कष्टाने थकलेले अवघे शरीर
नवचैतन्याने मग फुलून जावे ।
Sanjay R.

” तगमग ही जीवघेणी “

तगमग ही किती जीवघेणी
आहे अंतरात एक कहाणी ।
विचारांच्या पुरात वाहते
गालावर डोळ्यातले पाणी ।
दुःखात ही हसायचे कसे
हेच जीवन प्रत्येक क्षणी ।
Sanjay R.

” कर ना काही तू खुलासा “

कर ना काही तू खुलासा
मिळेल मज मग दिलासा ।
प्रश्नांचे चक्र फिरते डोक्यात
सांगा स्वस्थ बसू मी कसा ।
जीवनाच्या गणिताचा हा खेळ
मांडला तुजपुढे जसाच्या तसा ।
जीवनाच्या खेळात धैर्य हवे थोडे
सोडू नको डाव मधेच तू असा ।
क्षण सुख दुःखाचे येती जाती
आसवा सोबत हवा थोडा हसा ।
Sanjay R.

” वेळ कुठे थांबतो “

वेळ कुठे हो थांबतो
पुढे पुढेच  तो जातो ।
आठवणी कालच्या
ठेऊन मागे जातो ।
होते काल जसे
दिवस उद्याचा नसतो ।
रूप रंग घेऊन वेगळे
उदय सूर्याचा होतो ।
चंद्रही रोजच आपले
रूप कसे बदलतो ।
पण आशेचा एक किरण
रंग जीवनात उधळतो ।
Sanjay R.

” झुळूक शीतल वाऱ्याची “

चाहूल तुझी मज वाटे
झुळूक शीतल वाऱ्याची ।
सहवास तुझा भासे जणू
सुखद रात्र ती ताऱ्यांची ।

श्वास होतो हळुवार मग
मिटते पापणी डोळ्याची ।
स्वप्नवत मी बघतो तुला
आठवण तुझ्या असण्याची ।

आठवतो मज तो मोगरा
होते जाणीव सुगंधाची ।
तूच फुलते मनात माझ्या
राणी तू माझ्या जीवनाची ।
Sanjay R.

” वारा ही स्तब्ध होतो “

सम्पताच वादळ मोठे
वारा ही स्तब्ध होतो ।
उपद्व्याप काय केले
आढावा त्याचा घेतो ।
उडालेले घराचे छत
धाराशाई झालेली झाडे ।
काळजी ने ग्रस्त माणसे
त्यांच्या डोळ्यातली आसवे ।
चिव चिव करणारी पाखरे
आडोसा शोधणारे जीव ।
मावळलेल्या आशा
पदरात असलेली निराशा ।
लागतो वेळ थोडा पण
सवरतात दुःखातून सारे
परत वाहतात निशब्द वारे ।
Sanjay R.

” ठरवले जे मनात काही “

ठरवले जे मनात काही
सुरळीत ते होतच नाही ।
अवस्था मनाची त्राही त्राही
विचारांची तर होते लाही ।
वेदना साऱ्या दिशा दाही
दुःख कुणाचे कोण पाही ।
जगतो कुणी जीवन शाही
मरतो गरीब याची देही ।
Sanjay R.

” उगाचच होतात भास “

उगीचच होतात भास
मग संथ होतात श्वास ।
दरदरून फुटतो घाम
होतो जीवाला त्रास ।
स्वप्नांची असते दुनिया
नको नको ते आभास ।
तडफड चालते माझी
सोडवून घेण्याचे प्रयास ।
गळ्याला पडते कोरड
आवळतो कुणीतरी फास ।
का कशाला होते असे
लागतो एकच ध्यास ।
उलगडता उलगडत नाही
काय रहस्य असावे त्यास ।
स्वप्नातल्या आकृत्यांचा
कशासाठी असतो हव्यास ।
विचारांचा असावा खेळ
तुटतो माझ्यातलाच विश्वास ।
Sanjay R.