” राम रहिम आसाराम “

नावात त्यांच्या राम

भोंदु बाबास प्रणाम ।

राम पाल कुणी तर

राम रहिम आसाराम ।

भोळी भाबडी जनता

नकळे तयासी हराम ।

बुद्धी शुद्धी हरपली

बळी घेतो नराधम ।

नाही सोडले देवा तुज

आडोशाला तुझे नाम ।

चाले लबाडी लफंग्यांची

करी चारीत्र्य निलाम ।

भोळा भक्त देवा तुझा

झाला राक्षसांचा गुलाम ।

Sanjay R.

” ध्यास “

लागला ध्यास

अंतरात विश्वास

एक एक श्वास

मनी आभास

चालला प्रवास

कधी फास

कधी सुहास

आनंद निवास

जिवन खास

Sanjay R.

“वेध “

नजरेने तुझ्या ही

काय जादु केली ।

सर्वस्व विसरलो

तहान भुक नेली ।

सदैव तुझेच वेध

झोप माझी उडाली ।

स्वप्नातही तुच असे

जिव होतो वर खाली ।

हसतो मी पण बघुन

हास्य तुझ्या गाली ।

शोधतो भिर भिर मी

आहेस तुच खयाली ।

Sanjay R.

” पावसाची सर “

बघुन वाट पावसाची

जीव बळीराजाचा झाला अधर ।

सुखावला किती तो

येता एक पावसाची सर ।

पाठी कर्जाचा डोंगर

वाटे का होइल त्यात अजुन भर ।

पावला बघा देवच जसा

फुलली शेतं आला आनंदाला बहर ।

नद्या नाले सारं भरु दे आता

होती सारखी त्याची आकाशी नजर ।

हात जोडुन करतो धावा

देवा ढगांचा आकाशी होउ दे गजर ।

Sanjay R.

आभाळ

आभाळाला लाउन बसला

बळीराजा आपला डोळा ।

आकाशातल्या ढगांमधे

शोधतो तो ढग काळा ।

हिरमुसलेली शेतं बघुन

हुंदक्याने दाटला गळा ।

विखुरताहेत स्वप्न सारी

निघाली आसवं घळघळा ।

Sanjay R.

नंद लाला

गोपाला गोपाला तु

गिरीधर लाला ।

क्रिष्ण कन्हैय्या तु

देवकी नंद लाला ।

आवडीचे तुझ्या

दही दुध लोणी ।

गोपीकांचा लाडका

नसेल इतका कोणी ।

मैत्रीची मिसाल तु

मित्र तुझा सुदामा ।

संपला दुष्ट तो

कपटी कंस मामा ।

सुर बासरीचे ऐकुन

होइ वेडी ती राधा ।

अर्जुनाचा सारथी तु

महाभारताचा विधाता ।

Sanjay R.

” आनंद “

मैत्रीचा एक हात

सार्या जिवनाची साथ ।

चढ उतार जिवनातले

करुन त्यावर मात ।

जगायचं सारं आयुष्य

रोज नवी प्रभात ।

जावं लागेल सोडुन

कधी एक क्षणात ।

तोवर हसायचं

खुप खुप आनंदात ।

Sanjay R.

फाटका संसार

मोठे किती

हे घर आमचे ।

खाली धरती

वर आकाश ।

आडोशाला

आहेत दगड ।

पाउस पाण्याची

नाही चिंता ।

फाटका संसार

जिवनाची व्यथा ।

पोटाची भुक

जळती गाथा ।

Sanjay R.

” मनच जळलं “

कसं कुणास ठाउक

पण आज कळलं ।

माणसाचं ना

मनच जळलं ।

माणसांनी माणसांना

किती छळलं ।

माणुसकी बघुन

सारं जग हळहळलं ।

माणसाचं ना

मनच जळलं ।

वाटलं होतं

संकट टळलं ।

आलेलं तुफान

मागच्या मागे वळलं ।

विचारांचं आवरण

कित्ती मळलं ।

माणसाचं ना

मनच जळलं ।

Sanjay R.

” हो गयी रात “

ढल गया दिन

हो गयी रात

न जाने कब होगी

उनसे मुलाकात ।

आज दिलमे है

कुछ मनकी बात ।

चांद को मीला

चांदनी का साथ ।

मिले जब दोनो

हातो मे हात ।

ढल गयी रात

अधुरी मुलाकात ।

दिल मे रह गयी

दिल की बात ।

साथ सुरजके

फिर एक शुरुवात ।

कब होगी रात

होगी कब मुलाकात ।

Sanjay R.