” थैमान पावसाचे “

दिवस हे पावसाचे
आच्छादन आभाळाचे ।
साम्राज्य सावलीचे
नाही दर्शन सूर्याचे ।
रिमझिम नृत्य चाले
अंगणात पावसाचे ।
अंग अंग भिजले
लोट वाहे पाण्याचे ।
नदी नाले गेले भरून
थैमान तिथे पुराचे ।
जीवनाची झाली गती
ओघळ वाहे आसवांचे ।
Sanjay R.

” कळी “

कळ्यांची झालीत फुले
कशी वाऱ्यासंगे डूले ।
दरवळ सुगंधाचा चाले
आणि मन मोहित झाले ।
Sanjay R.

” शेतकरी “

मी आहे शेतकरी
कर्माने मी कष्टकरी ।
राबतो मी दिवस रात्र
जीवन माझे हातावरी ।नेहमी नजर आकाशात
भीती असते अंतरात ।
निसर्गाचे चक्रच न्यारे
झेलतो सारेच मी आघात ।बांधावरती होऊन उभा
बघतो जेव्हा स्वप्न सुखाचे ।
मागून येऊन धडक मारते
जीवन माझे आहे दुःखाचे ।रक्ताचे मी करतो पाणी
लुटून नेतो दुसराच कोणी ।
भोग भोगतो शेतकर्यांचे
डोळ्यातही मग नसते पाणी ।
Sanjay R.

” स्वप्न मनातले “

प्रत्येकाचेच स्वप्न असते
नाव लौकीक मिळवणं ।
हळव्या असतात भावना
त्याही थोड्या जपणं ।

हवा असतो आनंद
मिळतो त्यात परमानंद ।
होतो कधी व्यक्त
शब्दात उतरवणे हाही छंद ।

रमतो स्वतःच्याच विश्वात
होतो त्यातच धुंद ।
बघून दुःख सारे
होऊन अश्रू गळतात बंध ।
Sanjay R.

” घेऊ नको श्वास “

बघ जरा तू माणसा
घेऊ नको श्वास ।
हवा फुकट जरी
त्यात कोरोनाचा भास ।

दूर थोडा तू रे राहा
नाही कोणाचा भरोसा ।
झाली बाधा तुला तर
होशील वेडा पिसा ।

दिवस किती अजून बाकी
नाही ठाऊक कुणास ।
जपूनच राहा तू रे जरा
येणार नाही कोणी मारणास ।

पैसा अडका दे सोडून
कमावले खूप तू जोडून ।
लुटू दे ते सारे आता
नाही फायदा रडून ।

पहा जगाचे झाले हाल
चीनचे फुलले गाल ।
जगण्याची रीत अशी
लढायचे घेऊन ढाल ।
Sanjay R.

” सारेच बाप्पा तुमच्या हाती “

आलेत आज बाप्पा
मिरवणूक कुठेच नव्हती ।

आनंद मनात तोच
उत्साह पण सभोवती ।

काय रे तू कोरोना
घातली मनात भीती ।

बाप्पा सोबत नेतील
सांग थांबशील तू किती ।

घे मिरवून तू दिवस दहा
करू नकोस कुणाची क्षती ।

हरवलेत सारे स्वप्न
बघ दुनियेची काय गती ।

करा बाप्पा तुम्हीच काही
सारेच आहे तुमच्या हाती ।
Sanjay R.

” दुःखाचे दुःख नाही “

दुःख हेच आहे
दुःखाचे दुःख नाही ।
पाहून दुःख माझे
सुखही दूरच राही ।

काळजाला काळजी
डोके चिंता वाही ।
शोधतो उत्तर जेव्हा
उरतात प्रश्न काही ।

उघडून बघतो जेव्हा
बघतात डोळे काही ।
कुजबुज होते थोडी
भिंतीला कान नाही ।

क्षण एक सुखाचा
दुःखाचा लवलेश नाही ।
हसत हसत जगायचे
आनंद कुठे कमी काही ।
Sanjay R.

” रिमझिम पाऊस “

” रिमझिम पाऊस ”

झडच लावली या पावसाने
झाला सगळीकडे चिखल ।

वर आभाळ गच्च भरलेले
त्यात नाही सूर्याची दखल ।

साचले पाणी जागोजागी
नाही जिथे जागा सखल ।

रस्ते झालेत ताल तलाव
गड्डे त्यात किती खोल ।
Sanjay R.

” कर ना वो भजे “

” कर ना वो भजे “झमझम झमझम
पाऊस पडून रायला
कर ना वो भजे
गया सुकून रायला ।एकच हाये गिलास
जमवतो त्याले पयला ।
बाबुराव येतोच मने
होईन मंग नैला दैला ।लय भिजलो पावसात
शर्ट न्हाई वायला ।
प्यांट त गच्च हाये वला
सुकून थोडा रायला ।बसल्या जागी इचार यते
पिकन का न्हाई च्यायला ।
कर्जाचा डोंगर डोईवर
फिटन कसा मायला ।जाऊ दे ना आता
इचार कहाले कराचा ।
चार चार भजे खाऊन
शिन सारा घालवाचा ।Sanjay R.

” हवा विरंगुळा “

धकाधकीच्या या जीवनात
हवा विरंगुळा काही क्षणाचा ।
येईल मन विसवून थोडे
आनंद किती या जीवनाचा ।

चाले सदा धावपळ किती
प्रश्न मोठा या पोटाचा ।
रक्ताचे होते पाणी आणि
पालथा डोंगर कष्टाचा ।

मैत्री नाते बंध किती हे
धागा कसा या जीवनाचा ।
अंत हे तर पूर्णच सत्य
विचार नकोच दुःखाचा ।
Sanjay R.

” मन अधीर झाले “

मन अधीर झाले
कशा कशात गेले ।
आकाश इतके विचार
फिरून नभात आले ।

गती किती या विचारांची
नाही विसावा मनाला ।
वाटे कधी मनात
आता सांगू मी कुणाला ।

भिरभिर पाहे डोळे
कान वेध तो घेती ।
मन भरले जरी तुडुंब
जागा अंतरात रीती ।
Sanjay R.

” नको जाऊस तू सोडून “

नको जाऊस तू सोडून
वारा आला आणि बघ
ढग गेले उडून ।

स्वच्छ झाले आकाश
क्षितिज बघ आहे पुढे
नाही काहीच दडून ।

घे पुसून डोळे जरा
हुंदकेही सावर जरा
सुकलेत आसवं रडून ।

अजूनही उभा वृक्ष
रोकून ते वादळ सारे
ये परत तू वळून ।
Sanjay R.

” नशीब फिराले वेळ नाही लागत “

बाबू घे ना हातात ईळा
पर लटकवू नको गळा ।

टाक ना कापून तन
पिकन जास्त मन दोन मन ।

येईन पैसा हातात त
लागण तुह्याचं कामात ।

पैशानच होते बापा सारं
दुःख गरीबच नाही बरं ।

लेकरायले नाही शाळा
चालते निस्ता खेळा ।

पडलं कोणी बिमार पोट्ट
औषध कुठी न डॉक्टर कुठी ।

मेहनतीवर तुयाच बापू
वाजते राजकारणात भोपु ।

नशीबच तुह गा फुटक
आयुष्यही झालं तुटक ।

कधी निसर्गाचा घात
धुते व्यापारी बी हात ।

पर हारू नको असा
दिवस तुह्या बी येईन तसा ।

सोडू नको गा मेहनत
नशीब फिराले येळ नाही लागत ।

Sanjay R.

” तू कोर चंद्राची “

तू कोर चंद्राची
राणी आहेस अंधाराची ।

टीम टीमती तारे
सभा आकाशाची ।

धराही फुलली
चमचम काजव्याची ।

ताल सूर जमला
मैफिल रातकिड्यांची ।

मधेच डोकावून जाती
आरास तिथे ढगांची ।

उठून सारे जाती
लागता चाहूल सूर्याची ।
Sanjay R.

” आहे मन मधुर “

मनच आहे ते
असंख्य विचारांचं घर ।
सोडलं मोकळं
पळतं दूर दूर ।
ठेवलं बंधून तर
होतं किती आतुर ।
गोधळत जेव्हा ते
लागत नाही सूर ।
सोडले धैर्य तर
होते चुर चुर ।
ठेवता अंकुश थोडा
येई आनंदाला पूर ।
जगायचे आनंदात
आहे मन मधुर ।
Sanjay R.

” नाते “

नात्यांचा तर झाला अंत
आहे ज्याला तो निवांतनसेल त्याच्या मनात खंत
भिर भिर पाही बसून शांतवाटे जणू तो मोठा महंत
नाते तुटले मनात आकांत
Sanjay R.