” अनमोल मोती “

तु अनमोल एक मोती
मोल मलाच ठाव किती ।
जुळला बंध मनाचा
झाली आपुली प्रीती ।
साथ तुझी मज आता
दे हात तुझा या हाती ।
हरवू नकोस कुठे तू
वाटे थोडी मज भीती ।
Sanjay R.

” आईना “

सजना तुम सवरना तुम
देखकर आईना ।
रूप तुम्हारा सुंदर इतना
कुछ हमको है कहेना ।
हिरा हो, या तुम मोती
दिलका हमारे हो गहेना ।
खो न जाना कभी
दिलमे ही तुम रहेना ।
बसा लिया है आखोमे
ना आसू बनकर बहेना ।
Sanjay R.

” एक थेंब पाणी “

एक थेंब पाणी
सूर्याची ही कहाणी ।
सुकले नदी नाले
मिटली का निशाणी ।
हंडा घेऊन हाती
चला जाऊ अनवाणी ।
ओसाड झाले गाव
नाही उरला कोणी ।
पेटली आग आता
मिटते बघा पापणी ।
हवे मजला आता
एक थेंब पाणी ।
Sanjay R.

” वणवा पेटला “

झळा उन्हाच्या कशा या
अंग अंग निघते भाजून ।
नाही उरले झाड कुठेच
उभा उन्हातच मी अजून ।

शोध घेतला पाखरांचा
चिमणी पण नव्हती कुठे ।
पाण्यावाचून सांगा कसे
जंगलही झाले सुटे ।

वाळून गेलीत झाड सारी
उडताहेत पानं दूर दूर ।
मधेच एक ढग दिसतो
त्यात बघतो पावसाचा पूर ।

कोरडी पडली जीभ आता
पेटला वणवा त्या दूर ।
थेंब भर पाण्यासाठी
जीव झाला कसा आतुर ।
Sanjay R.

” उरली फक्त राखड “

वाट मनाची वेडी वाकडी
आहे किती ती अवघड ।

निघतो चालाया मी जेव्हा
होते जीवाची तडफड ।

एक एक पाऊल ठेवता
होते किती ती पडझड ।

चाललो उठून मी परत
करे छाती मग धडधड ।

गेली जाळून सारी स्वप्न
आता उरली फक्त राखड ।

उचलाया नाही कोणी
देईल हवाच तिला पाखड ।
Sanjay R.

” डोळे “

जेव्हा मी ना
बघतो तुझ्या डोळ्यात ।
थांबतो श्वास
मधेच माझ्या गळ्यात ।
ठेवतो तुझी छबी
मग मी माझ्या डोळ्यात ।
बघतो मिटून डोळे
तुलाच मी माझ्या स्वप्नात ।
Sanjay R.

” सूर्याचा तिढा “

उन्हाचा जोर बघा
कमी झाला थोडा ।
आभाळानं वेढलं
सावलीचा सडा ।
बरं वाटत जरा
नाही सूर्याचा तिढा ।
गर्मी पाई तर होतो
माणूस चिडचिडा ।
Sanjay R.

” भाव मनातला “

तू आहेस माझ्या
मनातला भाव ।
मनाची माझ्या
तुझ्याकडे धाव ।
नको करुस तू
मनावर माझ्या घाव ।
ये ना सखे जवळ
प्रेमाला माझ्या प्रेम तू लाव ।
Sanjay R.

” साद “

स्वप्नात तू देतेस साद
मिटले असतात डोळे तेव्हा ।वाट तुझीच बघतो मी
सांग ना मज तू येशील केव्हा ।भरून गेले काळीज माझे
आठवणींना सांग ठेऊ कुठे ।नजरेला माझ्या आस तुझी ग
तुझ्याच साठी हे हृदय तुटे ।
Sanjay R.

” सूर्य चंद्र “

लागले ग्रहण सूर्याला
बघायचे मज चंद्राला ।
सळ सळ जरी वाहे तो
अस्तित्व कुठे वाऱ्याला ।

उमलला गुलाब अंगणात
डोलतो कसा डौलाने ।
धुंद झाले अंगण सारे
मंद धुंद सुगंधाने

स्वप्नच देतात साद मनाला
बंद असतात डोळे जेव्हा ।
अवतरतो मग सूर्य धरेवर
होते तांबडे आकाश तेव्हा ।
Sanjay R.

” तूच तू “

निरागस तू
मनोहार तू ।
वाटे मजला
आधार तू ।

आचार तू
विचार तू ।
फुलांचाच
बहार तू ।

गंध तू
सुगंध तू
विचारांचा
बंध तू ।

स्वप्नात तू
नेत्रात तू
बघतो जिथे
अंतरात तू ।
Sanjay R.

” मन “

मन सुखाचा सागर
कुठला त्यास किनारा ।
हळूच एक फुंकर यावी
होऊन जावे वादळ वारा ।
आकाशात ढग यावेत
सोबतीला पावसाच्या धारा ।
काळोखाची चादर ओढून
बघतो त्यातून लखलख तारा ।
पहाटेचे तांबडे फुटता
प्रकाश होतो आसमंत सारा ।
प्रीतीचा हा बंध नाजूक
अंतरात त्याचाच इशारा ।
Sanjay R.

” राणी “

स्त्री असते सुंदर ज्ञानी
रंग रूप निर्मळ पाणी
शूर वीर ती लक्ष्मी राणी
नका समजू अबला कोणी
Sanjay R.

” ध्यास “

ध्यास माझ्या मनाला
सांगू मी कुणाला
सांगायचं बरच तुला
आवडेल का तुला
धिरच होत नाही
होतात वेदना अंतराला
घ्यायचा श्वास खुला खुला
Sanjay R.

” साथी “

‘तेरी हर अदा
मुझे खूप भाती है ।
तुम दूर हो मगर
सपनो की साथी है ।

सोचता है जब
मेरा यह दिल ।
याद तुम्हारी ही
तो आती है ।

भूल न जाना कभी
तुम्ही हो एक ।
जो मुझको रात दिन
सताती है ।
Sanjay R.

” काय नाव देऊ “

डोळ्यात तुझ्या बघून
सुचतात चार शब्द ।
आतुर होते मन आणि
हृदय होते स्तब्ध ।

नाव काय देऊ सांग
तुझ्या माझ्या नात्याला ।
अथांग हा सागर किती
उभा मी या काठाला ।

अंतरात उठले वादळ
थरथर होते शब्दांची ।
शब्दांचीच झाली कविता
बघ तुझ्याच आठवांची ।
Sanjay R.

” गंध “

दार मनाचे होते बंद
मन मात्र बेधुंद ।
वाटे मनास फार
कसा हा छंद ।
पाकळीला कधी
असतो का गंध ।
उमलू दे फुल
पसरू दे सुगंध ।
उठू दे दरवळ
मंद मंद ।।
Sanjay R.

” आस “

तुझेच वेड मज
हे का कसे लागले ।
करतो विचार तुझाच
मन तुझेच जाहले ।ओढ अंतरात तुझी
आस तुझ्या भेटीची ।
हरली तहान भूक
उरली तूझ्या प्रीतीची ।शब्दात तुझ्या शोधतो
माझा मीच कुठे आहे ।
आभास जेव्हा होतो
हृदयात तू माझ्या आहे ।
Sanjay R.