” लागली चाहूल “

पहाटेचा गार  गार वारा
लुप्त होतो आकाशी तारा ।
सूर्य बघतो डोकावून जरा
प्रकाशित होतो आसमंत सारा ।
किलबिल पक्षांची त्यांचाच तोरा
लागली चाहूल नाच रे मोरा ।
Sanjay R.

” एवढेच काय ते मागणे “

नाही कशाचे मागणे
सारेच मज लाभले ।
देवा तुझ्याच कृपेने
जीवन माझे हे फुलले ।

काय मागू मी तुजपाशी
दे मन जसे आभाळ खुले ।
परपकारी होऊ दे मज
जशी देवावरची फुले  ।

हवा भाव मज निरागस
कुविचारांचे नको झुले ।
लोभ  मत्सर विनाशक
प्रेमानेच तन मन डोले  ।
Sanjay R.

” रंगाचा हा सोहळा “

रंग लाल लाल
हिरवा पिवळा ।
खेळे राधा संगे
कृष्ण सावळा ।

विसरून दुःख सारे
होतो ढवळा पिवळा ।
ओळखेल कशी ती
तिचाच तो मावळा ।

खेळ चाले रंगांचा
होऊनिया बावळा ।
उत्साही आनंदी
रंगाचा हा सोहळा ।
Sanjay R.

” अंतरात अनामिक ओढ “

कहाणी ही तुझी माझी
नाही तिला कुठली जोड ।

तरी वाटे मनास माझ्या
अंतरात अनामिक ओढ ।

घालवू कश्या त्या आठवणी
छेडती मज ती त्यांची खोड ।
हुंदके आणि नेत्र लढती
लागते मग त्यांचीच होड ।

जा विसरून सारे आता
भूतकाळ सारा आता तू सोड ।
दे सोडून बंधन सोडून सारे
आयुष्याला करू या गोड ।
Sanjay R.

” ठेवले आहे जपून “

अंतरात विचार किती
कुठे काय आहे लपून ।
क्षण ते सारेच मी
ठेवले आहेत जपून ।
शब्दन शब्द तुझा बघ
आहे हृदयात छापून ।
फुलले काव्य  सुगंधी
सर्वत्र दरवळ व्यापून ।
Sanjay R.

” रंग होळीचा “

यंदा होळीचे रंग खेळू नका
कोरोनाला घरात घेऊ नका ।

दूर दूर राहा दुरूनच पहा
रंगीत फुलांना देवावर वाहा ।

येतील परत होळीचा सण
आनंदाने मग खेळू आपण ।

सांभाळा थोडे नियम पाळा
कोरोनाचा रंग आहे काळा ।

मुलं बाळं आता आहेत घरात
बघताहेत कशी वाकून दारात ।

काळजी घ्या काळजी करा
जातील हे दिवस धीर धरा ।
Sanjay R.

” हवा विसावा क्षणभर “

बघून वाट मी थकलो
हवा विसावा क्षणभर।
मनात एकच आस आणि
होते लक्ष सारे वाटेवर ।
श्वासांनाही नव्हते कळत
जडला प्राण कुणावर ।
ज्योत ही विझली कधी
रात्रीला तो झाला जागर ।
गेले उडून प्राण जेव्हा
शब्दांचाच झाला गजर ।
Sanjay R.

” पुन्हा ती वेळ यावी “

सरतात दिवस पुढे पुढे
आठवणी उरतात मागे ।

जाऊन जुने येती नवीन
अनायास जुळती धागे ।

आठवणींच्या त्या डोहामध्ये
क्षण गेलेले ते होती जागे ।

वाटे पुन्हा ती वेळ यावी
सुखकर मग ते जीवन लागे ।
Sanjay R.

” सांगायचेच राहून गेले “

होते किती या मनात
सांगायचेच राहून गेले ।
क्षणोक्षणी बदलते विचार
डोळ्यावाटे वाहून गेले ।

शब्दही होते अबोल
जिव्हे आड अडून गेले ।
सारेच होते जे अंतरात
तिथेच ते दडून गेले ।

काय उरले काय सरले
हिशोब आता नाही उरले ।
आठवणीच सरल्या आता
मनही माझे मरून गेले ।
Sanjay R.

” शोधून जे सापडत नाही “

शोधून जे सापडले नाही
मिळाले ते आवडले नाही ।

मनात होते ते अजून काही
शोधू कुठे मी कळत नाही ।

अधीर मन हे वळत नाही
व्हायचे ते तर टळत नाही ।

कोण कुणाला छळत नाही
विचार मनातले जळत नाही ।
Sanjay R.

” अवघा आनंद एक होतो “

असेल जेव्हा गोष्ट हिताची
अवघा आनंद एक होतो ।
नसता हित जयात ज्याचे
दुःख उराशी घेऊन रडतो ।

कधी अचानक नकार मिळता
कसा कशाला क्रोधीत होतो ।
पायी आपुल्या कुर्हाड मारून
संकट स्वतःवर ओढून घेतो ।

जीवन हे सुख दुःखाचे घर
हास्य मुखावर आनंद देतो ।
सारून बाजूस अति विचार
जगणे आपुले सुखात करतो ।
Sanjay R.

” काहूर मनात “

झाली सांज वेळ
निघालेत सारे घरा ।
नशिबात का माझ्या
चाले उलटा फेरा ।

नाही घर दार ज्याचे
आयुष्यच दुःखाचा घेरा ।
शोधू कुठे मी माझा
आरशात जगाच्या चेहरा ।

शोधतो क्षण सुखाचे मी
भोवती दारिद्र्याचा पहारा ।
कणभर हवा मज आनंद
प्रयास त्यासाठीच सारा ।
Sanjay R.

” भाव विभोर “

भावनांचा तुटला बंध
मन झाले विभोर ।

आठवणींचा नको आभास
जिवा लागे घोर ।

क्षणभर वाटे हवा थोडा विसावा
पण मन होते आतुर ।

एकांत वाटे मग हवा हवा
कधी मन होते फितूर

येती मनात किती विचार
डोळ्यात आसवांचा पूर ।

नको वाटे सारे आता
जावे कुठेतरी दूर ।
Sanjay R.

” रंग बरसे “

आली आली होळी आली 
चला लावू या रंग गाली । 

हिरवा निळा लाल गुलाबी 
रंगांची तर बरसात झाली । 

दुर्गुणांची करून होळी 
आनंदाच्या पेटवू मशाली । 

नाचू गाऊ सारे आपण 
रंग उधळू वरती खाली ।
Sanjay R.

” का हा अट्टाहास “

जगण्यासाठी चाले
हा सारा अट्टाहास ।
पैसे हवा की प्रेम
मनात कशाचा ध्यास ।

मोगरा फुलतो तेव्हा
दरवळतो दूर सुहास ।
जीवन आहे तर
घ्यावाच लागेल श्वास ।

श्रम परिश्रम करायचे
मनात सुखाचा ध्यास ।

सुख दुःख येती जाती
चाले अखंड प्रवास ।
Sanjay R.

” शब्दा वाचून कळले सारे “

मना मनाची उघडली दारे
शब्दवाचून कळले सारे ।

वर आकाशात चन्द्र तारे
मंजुळ ध्वनी नि वाहते वारे ।

आटणीचे ते वादळ सारे
तुटले बंध नाहीत पहारे ।

निरोप माझा घेऊन इशारे
आले परत उघडून दारे ।

ये ना सखे तू वेचू तारे
शब्दा वाचून कळले सारे ।
Sanjay R.

” बघू नको वळून मागे “

बघू नको वळून मागे
आहेत तिथे गुंतलेले धागे ।
सोडवताना सारा गुंता
सुटेल हा रस्ता मागे  ।

अंधारातून होतो उजेड जेव्हा ।
चंद्रही लपतो सुर्या मागे ।
किलबिल होते पाखरांची
आणि जग होते सारे जागे ।

उठ जाऊ या त्या क्षितिजा पुढे
नसेल तिथे कोणीच मागे ।
चल जाऊ दोघेच आता
परत बांधु आयुष्याचे धागे ।
Sanjay R.

” करू नका विलंब “

झाले गेले विसरा आता
करू नका हो विलंब ।
लस पोहोचली प्रत्येक गावी
करा तिचाच अवलंब ।

आहे कोरोनाचा कहर जारी
आजू बाजूला बघा जरा ।
किती जवळचे गेलेत दूर
झाला कसा हा जीवनाचा फेरा ।

लस घेऊन जरा सोडा चिंता
करू नका हो उशीर आता ।
जाईल निघून हेही दिवस
व्हाल चिंतामुक्त पाहता पाहता ।
Sanjay R.