पहाटेचा गार गार वारा
लुप्त होतो आकाशी तारा ।
सूर्य बघतो डोकावून जरा
प्रकाशित होतो आसमंत सारा ।
किलबिल पक्षांची त्यांचाच तोरा
लागली चाहूल नाच रे मोरा ।
Sanjay R.

पहाटेचा गार गार वारा
लुप्त होतो आकाशी तारा ।
सूर्य बघतो डोकावून जरा
प्रकाशित होतो आसमंत सारा ।
किलबिल पक्षांची त्यांचाच तोरा
लागली चाहूल नाच रे मोरा ।
Sanjay R.
नाही कशाचे मागणे
सारेच मज लाभले ।
देवा तुझ्याच कृपेने
जीवन माझे हे फुलले ।
काय मागू मी तुजपाशी
दे मन जसे आभाळ खुले ।
परपकारी होऊ दे मज
जशी देवावरची फुले ।
हवा भाव मज निरागस
कुविचारांचे नको झुले ।
लोभ मत्सर विनाशक
प्रेमानेच तन मन डोले ।
Sanjay R.
रंग लाल लाल
हिरवा पिवळा ।
खेळे राधा संगे
कृष्ण सावळा ।
विसरून दुःख सारे
होतो ढवळा पिवळा ।
ओळखेल कशी ती
तिचाच तो मावळा ।
खेळ चाले रंगांचा
होऊनिया बावळा ।
उत्साही आनंदी
रंगाचा हा सोहळा ।
Sanjay R.
कहाणी ही तुझी माझी
नाही तिला कुठली जोड ।
तरी वाटे मनास माझ्या
अंतरात अनामिक ओढ ।
घालवू कश्या त्या आठवणी
छेडती मज ती त्यांची खोड ।
हुंदके आणि नेत्र लढती
लागते मग त्यांचीच होड ।
जा विसरून सारे आता
भूतकाळ सारा आता तू सोड ।
दे सोडून बंधन सोडून सारे
आयुष्याला करू या गोड ।
Sanjay R.
अंतरात विचार किती
कुठे काय आहे लपून ।
क्षण ते सारेच मी
ठेवले आहेत जपून ।
शब्दन शब्द तुझा बघ
आहे हृदयात छापून ।
फुलले काव्य सुगंधी
सर्वत्र दरवळ व्यापून ।
Sanjay R.
यंदा होळीचे रंग खेळू नका
कोरोनाला घरात घेऊ नका ।
दूर दूर राहा दुरूनच पहा
रंगीत फुलांना देवावर वाहा ।
येतील परत होळीचा सण
आनंदाने मग खेळू आपण ।
सांभाळा थोडे नियम पाळा
कोरोनाचा रंग आहे काळा ।
मुलं बाळं आता आहेत घरात
बघताहेत कशी वाकून दारात ।
काळजी घ्या काळजी करा
जातील हे दिवस धीर धरा ।
Sanjay R.
बघून वाट मी थकलो
हवा विसावा क्षणभर।
मनात एकच आस आणि
होते लक्ष सारे वाटेवर ।
श्वासांनाही नव्हते कळत
जडला प्राण कुणावर ।
ज्योत ही विझली कधी
रात्रीला तो झाला जागर ।
गेले उडून प्राण जेव्हा
शब्दांचाच झाला गजर ।
Sanjay R.
सरतात दिवस पुढे पुढे
आठवणी उरतात मागे ।
जाऊन जुने येती नवीन
अनायास जुळती धागे ।
आठवणींच्या त्या डोहामध्ये
क्षण गेलेले ते होती जागे ।
वाटे पुन्हा ती वेळ यावी
सुखकर मग ते जीवन लागे ।
Sanjay R.
होते किती या मनात
सांगायचेच राहून गेले ।
क्षणोक्षणी बदलते विचार
डोळ्यावाटे वाहून गेले ।
शब्दही होते अबोल
जिव्हे आड अडून गेले ।
सारेच होते जे अंतरात
तिथेच ते दडून गेले ।
काय उरले काय सरले
हिशोब आता नाही उरले ।
आठवणीच सरल्या आता
मनही माझे मरून गेले ।
Sanjay R.
शोधून जे सापडले नाही
मिळाले ते आवडले नाही ।
मनात होते ते अजून काही
शोधू कुठे मी कळत नाही ।
अधीर मन हे वळत नाही
व्हायचे ते तर टळत नाही ।
कोण कुणाला छळत नाही
विचार मनातले जळत नाही ।
Sanjay R.
असेल जेव्हा गोष्ट हिताची
अवघा आनंद एक होतो ।
नसता हित जयात ज्याचे
दुःख उराशी घेऊन रडतो ।
कधी अचानक नकार मिळता
कसा कशाला क्रोधीत होतो ।
पायी आपुल्या कुर्हाड मारून
संकट स्वतःवर ओढून घेतो ।
जीवन हे सुख दुःखाचे घर
हास्य मुखावर आनंद देतो ।
सारून बाजूस अति विचार
जगणे आपुले सुखात करतो ।
Sanjay R.
आठवण होता
जीव पडतो धाकी ।
शल्य आहे मनात
अजूनही बाकी ।
आहेस कुठे तू
कोण तुला रोकी ।
झटकून विचार सारे
परत तू ये की ।
Sanjay R.
झाली सांज वेळ
निघालेत सारे घरा ।
नशिबात का माझ्या
चाले उलटा फेरा ।
नाही घर दार ज्याचे
आयुष्यच दुःखाचा घेरा ।
शोधू कुठे मी माझा
आरशात जगाच्या चेहरा ।
शोधतो क्षण सुखाचे मी
भोवती दारिद्र्याचा पहारा ।
कणभर हवा मज आनंद
प्रयास त्यासाठीच सारा ।
Sanjay R.
भावनांचा तुटला बंध
मन झाले विभोर ।
आठवणींचा नको आभास
जिवा लागे घोर ।
क्षणभर वाटे हवा थोडा विसावा
पण मन होते आतुर ।
एकांत वाटे मग हवा हवा
कधी मन होते फितूर ।
येती मनात किती विचार
डोळ्यात आसवांचा पूर ।
नको वाटे सारे आता
जावे कुठेतरी दूर ।
Sanjay R.
आली आली होळी आली
चला लावू या रंग गाली ।
हिरवा निळा लाल गुलाबी
रंगांची तर बरसात झाली ।
दुर्गुणांची करून होळी
आनंदाच्या पेटवू मशाली ।
नाचू गाऊ सारे आपण
रंग उधळू वरती खाली ।
Sanjay R.
जगण्यासाठी चाले
हा सारा अट्टाहास ।
पैसे हवा की प्रेम
मनात कशाचा ध्यास ।
मोगरा फुलतो तेव्हा
दरवळतो दूर सुहास ।
जीवन आहे तर
घ्यावाच लागेल श्वास ।
श्रम परिश्रम करायचे
मनात सुखाचा ध्यास ।
सुख दुःख येती जाती
चाले अखंड प्रवास ।
Sanjay R.
जगू चला आज
मना सारखे ।
दिवस रोजचा तर
करतो मनास पारखे ।
मनात आशा आकांक्षा
वादळ विचारांचे सारखे ।
घडते कुठे मनातले
मग वाटे पोरके ।
Sanjay R.
मना मनाची उघडली दारे
शब्दवाचून कळले सारे ।
वर आकाशात चन्द्र तारे
मंजुळ ध्वनी नि वाहते वारे ।
आटणीचे ते वादळ सारे
तुटले बंध नाहीत पहारे ।
निरोप माझा घेऊन इशारे
आले परत उघडून दारे ।
ये ना सखे तू वेचू तारे
शब्दा वाचून कळले सारे ।
Sanjay R.
बघू नको वळून मागे
आहेत तिथे गुंतलेले धागे ।
सोडवताना सारा गुंता
सुटेल हा रस्ता मागे ।
अंधारातून होतो उजेड जेव्हा ।
चंद्रही लपतो सुर्या मागे ।
किलबिल होते पाखरांची
आणि जग होते सारे जागे ।
उठ जाऊ या त्या क्षितिजा पुढे
नसेल तिथे कोणीच मागे ।
चल जाऊ दोघेच आता
परत बांधु आयुष्याचे धागे ।
Sanjay R.
झाले गेले विसरा आता
करू नका हो विलंब ।
लस पोहोचली प्रत्येक गावी
करा तिचाच अवलंब ।
आहे कोरोनाचा कहर जारी
आजू बाजूला बघा जरा ।
किती जवळचे गेलेत दूर
झाला कसा हा जीवनाचा फेरा ।
लस घेऊन जरा सोडा चिंता
करू नका हो उशीर आता ।
जाईल निघून हेही दिवस
व्हाल चिंतामुक्त पाहता पाहता ।
Sanjay R.