” इबोला गेला कोरोना आला “

आता तुम्ही काहीही बोला
व्हायरस बेकार हो इबोला ।

सांगू काय हो मी तुम्हाला
आता तर चायनात कोरोना आला ।

माणसाच्या जीवाचा खेळ झाला
निरपराध बिचार्यांचा जीव गेला ।

भारत ही आमचा घाबरून गेला
उपाय काय ते तेवढंच बोला ।

इबोला इबोला करता काय
त्याला जाऊन तर काळ झाला ।
Sanjay R.

” केलेस तू भूत आपले “

रे मानावा
केलेस तू भूत आपले
जीवन तुझे रे तिथेच सरले ।
झालास तू बाहुले त्याचे
अस्तित्व तुझे रे कुठे उरले ।

आचार विचार देऊन सारे
सांग कुणास तू घडवले ।
अविचारी तूच महान
साऱ्यांना तर तूच रडवले ।

यंत्र झालेत सर्वस्व आता
जे जे होते सारे पढवले ।
बुद्धिवान ते यंत्र झाले
कामात तुझ्या तुला अडवले ।

गरज कुणास आता तुझी रे
तुझ्या विनाच होईल सारे ।
निर्बुद्ध तू ठरशील आता
अक्कल तुझी , तुझेच तारे ।
Sanjay R.

” विजय हवा मरणावर “

सुरू आहे वारी
प्रगतीच्या वाटेवर
ज्ञान विज्ञान पुढे
पोचायचे शिखरावर ।

अखंड शोधाशोध
यशाच्या आशेवर ।
जीवन मात्र आता
लटकत्या तारेवर ।

लाभल्या सुख सुविधा
फरक पडला जीवनावर ।
एकच शोध बाकी आता
विजय हवा मरणावर ।
Sanjay R.

” बहार पुन्हा येणार आहे “

कधी सुख कधी दुःख
ही वाट आयुष्याची आहे ।
पिकली पानं पडतात गळून
हेच जीवनाचे सत्य आहे ।
धीर धर ना थोडा जरा
जीवनात बहार येणार आहे ।
आयुष्याचे हेच चक्र
आसव डोळ्यातले हसणार आहे ।
Sanjay R.

” माय मराठी होय मराठी “

अति विशाल आहे
मराठी ची गाथा ।
लहानपणी ऐकायचो
मराठीतच कथा ।

ज्ञानेश्वर तुकाराम
मराठीचे स्तंभ ।
अंतरात केले घर
वाचू किती अभंग ।

मोठमोठे साहित्यिक
नावे आहेत कितीतरी ।
झेंडा मराठीचा त्यांनी
झळकवला उंचावरी ।
Sanjay R.

” डोळ्यात आसू “

नाकावर तुझ्या रागआणि
डोळ्यात नेहमीच आसू ।
तू ग माझे लाडके
आहे बाई रुसू ।
कळतं मला पण
कसं येतं तुला हसू ।
डोळे मिचकावले की
वाटते ग तू सासू ।
नेहमीच हसत राहा
आणू नको असू ।
Sanjay R.

” तू रे असाच शिकत राहा “

शिकून सवरून मोठा झाला
हाच तर तू रे गुन्हा केला ।
मोल मजुरीचे सारेच रस्ते
बंद तू रे करून आला ।
नोकरी हवी चाकरी हवी
स्पर्धेपाई ती मिळेना तुला ।
उद्योग धंदे नाही रे सोपे
पैश्या विना हलत नाही झुला ।
घे शिकून परत आता
लाव दहा वीस तू डिगऱ्या ।
वर्षोन गनती तू शिकत राहा
सरकारला पण रे तेच हवे ।
Sanjay R.

” पदर डोक्यावर “

तिचा पदर तिची आहे लाज
सांभाळते ती त्यात तिचा साज ।

जेव्हा लेकरू असे कडेवर
सुख देउ त्यासी तिचा पदर ।

ऊन पाऊस करे जेव्हा मारा
डोक्यावर पदर देई  गार वारा ।

पाहून एकटी लोक करी इशारा
एकटा पदर सांभाळी सारी धुरा ।

मान सन्मान लाज आणि लज्जा
कवच सुरक्षेचे देण्या पदर सज्ज ।

स्त्री चा पदर आहे तिचे सर्वस्व
सारेच जाणती आहे त्याचे वर्चस्व ।
Sanjay R.

” तू कर चुका “

करणी ही तुझीच
तू करत जा ना चुका ।
दुरुस्त करणे काम माझे
लावील मी त्यास हुका ।

चूक तुझ्या साऱ्या
त्यात तुला काय धोका ।
इकडून तिकडे फिरवले की
होईल रिकामा खोका ।

शब्द दोन चार असे
फिरवून तुम्ही फेका ।
कॉपी पेस्ट चा जमाना
वाट्टेल ते ठोका ।

चोरून दूध प्यायचे
करतो हेच बोका ।
हिम्मत कुणाची आहे का
नाही कुणाचा टोका ।

तू ना आता रोजच
करत जा चुका ।
गोड तुझा गाल
घेईल कुणी तरी मुका ।
Sanjay R.

” एक वेगळा अर्थ “

प्रेमाला एक ना
वेगळाच अर्थ
नाही त्यात स्वार्थ
नाही परमार्थ
बस आहे ती हाक
अंतरातली आर्त

काय प्रेमाचा
भावार्थ
लपले त्यात
शब्दार्थ
विचारांचा आहे
सर्वार्थ
कराया आकलन
मानावे तीर्थ
Sanjay R.

” पैसा सब कुछ “

येरे पैसा, जाऊ नको पैसा
पैसा पैसा करत जगायचे ।
पैश्या शिवाय काय दुसरे
आला पैसा की हसायचे ।

नको काम, नको कष्ट
मार्ग पैश्याचे हो शोधायचे
हात मळताच पैसा यावा
असेच काहीतरी करायचे ।

येणार नसेल पैसा सहज तर
अश्रू दोन मग गाळायचे ।
चोरी मारी लाच खोरी
करून पैसे मात्र मिळवायचे ।

पैश्याविना सुख कुठे हो
दुःखात कशाला पडायचे ।
पैसा तर आहे सब कुछ
कशाला गरिबीत मरायचे ।
Sanjay R.

” चर्चेचे द्वार “

मांडणार किती मनातले सार
झालेत आता विचारांवर वार ।

कसले हो हे चर्चेचे द्वार
याहून तर बरा बोअर बार ।

एक दोन तीन आणि चार
झेलायचा किती सांगा भार ।

सांगतो आता जिंकलात तुम्ही
पत्करतो आम्ही आमची हार ।

तुमचे आचार तुमचेच विचार
करा तुमचाच आता प्रचार ।
Sanjay R.

” काश्मीर हमारा “

थंड हवा गार गार वारा
निसर्ग रम्य परिसर सारा ।

उंच हिमालय , त्याचा तोरा
खळखळ वाहे पाण्याच्या धारा ।

शून्याखाली हो तिथला पारा
वाटते गर्वाने काश्मीर हमारा ।

पांढरा शुभ्र बर्फ चमके
हिरवा देवदार घेई ठुमके ।

गोरे गोमटे लोकही तिथले
वाटे नंदनवन आहे हे कुठले ।

दूर उंचावर शंकराचार्य मंदिर
ठेऊन अस्तित्व बाकी मिटले ।
Sanjay R.

” लव्ह यु जिंदगी “

जन्माला आलो तर जगायचे
येईल अंत तेव्हा हो मरायचे ।

सांगा जीवनाचा या काय अर्थ
दिसतो का हो कुठे यात स्वार्थ ।

आहे खळखळून मला हसायचे
धाय मोकलून कधी तरी रडायचे ।

उंच त्या आकाशात उडायचे
धपकन खाली येऊन मग पडायचे ।

रोज तेच ते नको हो जगायचे
काहीतरी वेगळं करून बघायचे ।

कानात कुणाच्या गुणगुणायचे
लव्ह यु जिंदगी आहे सांगायचे ।
Sanjay R.

” कशाचे हो नाते “

कुणाचे कुणाशी
कशाचे हो नाते ।
कामा शिवाय हो
जवळ कोण येते ।

नको माय बाप
नको भाऊ बहीण ।
राजा राणी दोघच
माझं मीच पाहीन ।

कुणाची कुणाला
गरज कुठे उरली ।
छोटीशी फॅमिली
माया आता सरली ।
Sanjay R.

” जगाची रीतच निराळी “

दिवसभर चाले
नुसती पळा पळी ।
रात्री शांती नि
परत तेच सकाळी ।

कुणाकडे असे
रोजच दिवाळी ।
कुणाच्या भुकेला
नसे एक पोळी ।

उपसतो कुणी कष्ट
रक्त आपले जाळी ।
बघतो बसून कोणी
वाजवितो टाळी ।

गरीब कुणी श्रीमंत
लिहून त्याच्या भाळी ।
जगाची ना हो या
आहे रीतच निराळी ।
Sanjay R.

” स्वातंत्र्य तर हक्क आमचा “

स्वातंत्र्य आहे तुम्हाला
बोला काय वाट्टेल ते ।
बिघडतं कुठं काही
विचारही तुमचेच ते ।

शिव्या घाला आडवे पाडा
माळीसाठी काढा जोडा ।
संस्कृतीला फोडा झोडा
माणुसकीला असेच तोडा ।

मान सन्मान हवा कुणाला
व्हायचे श्वापद हो आम्हाला ।
स्वातंत्र्य तर हक्क आमचा
सांगा काय करायचे तुम्हाला ।
Sanjay R.

” जगतो एक स्वप्न “

प्रत्येकाच्या मनात
असते एक स्वप्न ।
गाव असो वा शहर
चाले स्वप्नात जगणं ।
पोटासाठी चाले कष्ट
कष्टामध्ये तो मग्न ।
पाठ टेकवताच रात्री
आठवतात सारे विघ्न ।
निघून त्यातून मग
बघतो बंद डोळ्यात स्वप्न ।
हवं तसं अनुभवतो मग
तेच त्याच खरं जगणं ।
Sanjay R.