डोळेच सांगून जातात
काय असते मनात ।
वारा थांबतो थोडा
बोलतो आपल्या कानात ।
मन कधी हसते
दिसते सारे चेहऱ्यात ।
वार असो कुठलाही
दुःख होते काळजात ।
शब्दांचे घाव कठीण
गाल मग रुसतात ।
वाचा होते अबोल
ओठ कुठे बोलतात ।
सुखाचा होताच पाऊस
क्षण आनंदाचे वेचतात ।
बदलून रूप आपुले
सगळेच सोबत हसतात ।
Sanjay R.
