मनाच्या अडगळीत दडले काय
ढीग विचारांचा करू मी काय ।
मनात आहे जे जे आता
आठवते सारेच जाता येता ।
फुलतो मनात कधी आनंद ।
दुःखही सारेच हृदयात बंद ।
कधी वाटते नकोच काही
लुप्त होतात दिशाही दाही ।
जीवनाची तर हीच दशा
कधी चढते कशाचीही नशा ।
अबोल होते कधी मन माझे ।
फिरतो घेऊन सारेच ओझे ।
Sanjay R.
